नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेने शहरातील वाहतूक बेटांमध्ये बसविलेले लोखंडी फलक अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात न घेताच हे फलक उभारण्यात येत आहेत.
महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरातील वाहतूक बेटांमध्ये लोखंडी फलक उभारले आहेत. त्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक बेटांमध्ये असणारी शोभिवंत फुलझाडेही तोडून टाकली. आयटीआय सिग्नलजवळ असलेल्या वाहतूक बेटामध्ये बसविलेला फलक अगदी रस्त्याला खेटूनच आहे. अवजड वाहनाचा या फलकाला धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फलक अतिशय चुकीच्या दिशेला बसविण्यात आला असून, फलकाचा काही भाग थेट रस्त्यावरच आला आहे. या मार्गे अनेक अवजड वाहनेही जात असतात. कंटेनरचा धक्का लागला तरी हा फलक पडू शकतो. असे असतानाही संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने हा फलक बसविला आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी पाहणी करून संबंधित फलकाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले आहे
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…