नाशिक

जाहिरात फलकांमुळे अपघाताला आमंत्रण

 

नाशिक : प्रतिनिधी

महापालिकेने शहरातील वाहतूक बेटांमध्ये बसविलेले लोखंडी फलक अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकतात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात न घेताच हे फलक उभारण्यात येत आहेत.

महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी शहरातील वाहतूक बेटांमध्ये लोखंडी फलक उभारले आहेत. त्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक बेटांमध्ये असणारी शोभिवंत फुलझाडेही तोडून टाकली. आयटीआय सिग्नलजवळ  असलेल्या वाहतूक बेटामध्ये बसविलेला फलक अगदी रस्त्याला खेटूनच आहे. अवजड वाहनाचा या फलकाला धक्का लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फलक अतिशय चुकीच्या दिशेला बसविण्यात आला असून, फलकाचा काही भाग थेट रस्त्यावरच आला आहे. या मार्गे अनेक अवजड वाहनेही जात असतात. कंटेनरचा धक्का लागला तरी हा फलक पडू शकतो. असे असतानाही संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने हा फलक बसविला आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी पाहणी करून संबंधित फलकाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक वाहनधारकांनी व्यक्त केले आहे

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

20 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

20 hours ago