शहरातील 32 बिल्डरांना नगररचनाच्या नोटिसा

नाशिक : प्रतिनिधी
म्हाडा प्रकरण नाशिक शहरात चांगले गाजले. याप्रकरणी तत्कालीन पालिका आयुक्त कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. दरम्यान, म्हाडाकडे 20 टक्के सदनिका आणि भूखंड हस्तांतरित करताना अनियमितता करणार्‍यांना मनपा प्रशासनाकडून नोटिसा पाठविण्यात आल्या असून, या नोटिसांना त्वरित उत्तर देण्यास सांगितले आहे. 65 बिल्डरांपैकी 32 जणांना नोटिसा पाठविल्या आहेत.
म्हाडा प्रकरणावरून या प्रकरणातील व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी म्हाडा प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून अनियमितता करणार्‍या बिल्डरांवर तसेच अधिकार्‍यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेत मनपा नगररचना विभाग तसेच म्हाडा नाशिक येथील अधिकार्‍यांची संयुक्त बैठक झाली होती. दरम्यान, राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात महापालिका काय भूमिका घेते तसेच नवीन आयुक्त याबाबत कोणाला दोषी ठरवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या म्हाडा प्रकरणावरून नाशिक महापालिकेचे आयुक्त असलेले कैलास जाधव यांची तडकाफडकी बदली झाली. या म्हाडा प्रकरणाची नाशिक महापालिकेच्या नगर नियोजन विभागाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. नाशिक महापालिकेच्या नगर नियोजन विभागाने आतापर्यंत 65 पैकी सुमारे 32 बिल्डरांसह आर्किटेक्ट यांना नोटिसा बजावून तात्काळ त्याचा खुलासा करण्याचे आदेश बजावले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
विधिमंडळात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. कपिल पाटील व अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित करत संबंधित बिल्डर तसेच मनपा अधिकार्‍यांविरोधात काय कारवाई केली तसेच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. या सर्व घडामोडीनंतर आयुक्तांची बदली झाल्याचे चर्चा होती. दरम्यान, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत भूमी अभिन्यास व इमारत नकाशे विकसित करताना 20 टक्के भूखंड, सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात येते. परंतु, नाशिक येथे 2013 पासून ते आतापर्यंत सुमारे सात हजार सदनिका आणि 200 भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित केलेले नसल्याची धक्कादायक बाब गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उघडकीस आणली होती. त्यानंतर मोठे वादंग झाले होते.

कामावर मदार, जीवावर उदार!

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

10 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

16 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

21 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

27 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

42 minutes ago