नाशिक

ऐंशी कोटी खर्चाचे सीसीटीव्ही पाण्यात

कारवाईसाठी महाआयटीला अहवाल सादर, मनपा आयुक्त खत्रींची माहिती

नाशिक : प्रतिनिधी
स्मार्ट सिटी कंपनीने शहरात महत्त्वाच्या ठिकाणी महाआयटी कंपनीच्या माध्यमातून एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. यासाठी ऐंशी कोटींचा खर्च आला होता. मात्र, सहा वर्षांतच सीसीटीव्ही नादुरुस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या सीसीटीव्ही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाआयटीला दोनदा अहवाल पाठविण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांत सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने महाआयटी संस्थेच्या माध्यमातून शहरभर एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे ऐंशी कोटींच्या निधीतून बसविण्यात आले होते. मात्र, हे सर्व कॅमेरे खराब झाल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त खत्री यांनी दिली. येणार्‍या सिंहस्थात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यातून सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये हे सीसीटीव्ही शहरात बसविण्यात आले होते. दरम्यान, सिंहस्थासाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी बाकी राहिला आहे. सिंहस्थात दोन कोटी भाविक शहरात येण्याचा अंदाज असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना उभारण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. याकरिता शहरात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे जाळे विणले जाणार असून, याद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्याबरोबरच गैरकृत्य रोखण्याकरिता या कॅमेर्‍यांची पोलीस प्रशासनाला मदत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी बीएसएनएल कंपनीकडून ऑप्टिकल फायबर सुविधा भाड्याने घेण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच या प्रकल्पासाठी अडचणी आल्या. दरम्यान, सीसीटीव्ही प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, याबाबतचा अहवाल महाआयटीकडे पाठविला आहे.

CCTV worth Rs 80 crores in water

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

13 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

13 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

13 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

13 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

13 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

13 hours ago