नाशिक

सिंहस्थासाठी नव्याने पाच घाटांची निर्मिती

गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी

नांदूर-दसक येथे एक

दसक येथे एक

नंदिनी नदी संगमावर एक

ओढा येथे एक

तपोवनात कपिला संगम येथे एक

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात अमृत स्नानाच्या दिवशी सुमारे एक कोटीहून अधिक भाविक येण्याचा अंदाज असल्याने त्याद़ृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गर्दी वाढल्यास ऐनवेळी कुठलाही गोंधळ होऊ नये, याकरिता प्रशासन कमालीची खबरदारी घेत आहे. दरम्यान, रामकुंडावरच भाविकांची गर्दी होऊ नये, याकरिता आणखी पाच घाट उभारण्यात येणार असून, पाटबंधारे विभागाद्वारे सदर काम केले जाणार आहे.
सिंहस्थ प्राधिकरण प्रमुख प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक झाली. पाटबंधारे विभागाकडून चार घाट बांधले जाणार असून, या घाटांपर्यंत भाविकांना आणण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे. तर नव्याने ज्या घाटांची निर्मिती केली जाणार आहे. व 2015 मध्ये घाट बांधले आहेत. तेथे भाविकांना घेऊन जाण्यासाठी पोलिस प्रशासनाला नियोजन करावे लागेल. महापालिकेच्या बांधकाम विभागाला सदर घाटांपर्यंत चांगले रस्तेनिर्मिती करावी लागणार आहे. त्याद़ृष्टीने सदर बैठकीत कोणती जबाबदारी कोणत्या विभागाकडे असेल. याबाबतचे नियोजन करण्यात आले. भाविकांना शहरात येण्यापासून रोखू नका, अशा सूचना यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे शहरात अमृत स्नानाच्या दिवशी मोठी गर्दी होणार आहे. मात्र, खूपच गर्दी झाल्यास अशावेळी पर्यायी व्यवस्था असावी, यासाठी प्राधिकरण प्लॅनिंग तयार करून ठेवणार आहे. पाटबंधारे विभाग वास्तुविशारदाच्या माध्यमातून आकर्षक घाट उभारणार आहे.

त्र्यंबकला 5 किमीचा घाट

त्र्यंबक येथे गोदावरी नदीवर समोरासमोर प्रत्येकी अडीच कि.मी. असा तब्बल पाच किमी घाटांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे भाविकांची सोय होईल. लवकरच याबाबतचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू केले जाईल.

 

Editorial Team

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago