आपल्या बहुविध लेखणीने वाचकांच्या मनावर गारुड निर्माण करणारे प्रसिद्धिपराङ्मुख लेखक रंगनाथ पठारे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस. त्यानिमित्त..
खूपच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, रंगनाथ पठारे यांचे ताम्रपट पुस्तक वाचले. त्यापूर्वी आकाराने छोटे छोटे (बारके बारके) पुस्तके वाचण्याची सवय. ‘ताम्रपट’ मात्र आकाराने, विस्ताराने मोठेच. विविध सामाजिक, राजकीय चळवळीची तोंडओळख होण्याची ती माझी सुरुवातच होती. त्यामुळेच या पुस्तकातील अनेक व्यक्तींनी खूप दिवस मनात घर केले. त्यातून पुढे त्यांनी अनेक विषयांवर लिहिले. शक्यतो सर्वच पुस्तके वाचली. बर्यापैकी आवडली तर काही वाचून डोक्यात गुंता करून गेली. उदाहरणार्थ सात पाटील कुलवृत्तांत अगदी उंच डोंगर चढताना दम लागावा तसं वाटलं खरं; पण टोकावर गेल्यावर नजर विस्तारली. सरव बाजूने परिसर दिसू लागला. आत्ताच्या एक रंगी समाज बनविण्याच्या प्रयत्नात सात पाटील बरोबर मध्ये उभे आहेत. जगभरातून अनेकांनी भर टाकून बनविलेली आपली संस्कृती आहे. आजचं दिसणारं तिचं स्वरूप विविध रंगांनी रंगलेलं आहे. त्याचं कारणही या पुस्तकाने वाचकांना स्पष्ट केलं तर असो. त्यांच्या लेखनाचं मूल्यमापन करणे माझा प्रांत नाही. एक वाचक म्हणून लक्ष वेधून घेणारा हा लेखक आहे, इतकंच!
तर अशा लेखकास प्रत्यक्ष भेटून मनातील काही शंका विचाराव्यात म्हणून माझे मित्र कैलासवासी शंकर बोराडे यांना ही इच्छा पूर्ण करावी म्हणून गळ घातली. त्यांनी जायच्या अगोदर स्पष्ट केलं, आपण थेट घरी संगमनेरला जाऊ, मात्र भेटले नाही किंवा भेट नाकारली तर बिलकूल वाईट वाटून घेऊ नको. धोक्याची सूचना मिळाली तरी आम्ही एके दिवशी त्यांच्या दारात जाऊन उभे राहिलो. भेट झाली. भरपूर गप्पा केल्या. माझ्या मनातील साहित्यविषयक काही प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. नंतर काही दिवसांनी माझे पळसे गावी ते विनंती केल्यानुसार आले. अगदी मोजक्या 15 ते 20 माणसांसमोर छोटेखानी मनोगतही व्यक्तकेले. नंतर दिल्ली येथे साहित्य अकादमीच्या कार्यालयात योगायोगाने भेटले. नाशिकमध्ये कार्यक्रमात जात असे. मला तर त्यांचे भाषण ऐकण्यापेक्षा लिहिलेलेच मस्तच वाटते. खरंतर त्यांच्याबाबत अनेक प्रवाद आहे. हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग असू शकेल. स्वभावाने काटेकोर. साहित्य संवेदनासारख्या उत्सवी आयोजनाच्या प्रकाराबद्दल टीकाकार असं बरंच काही असलं तरी एक दर्जेदार लेखक म्हणून त्यांचे मराठी भाषेतील स्थान कोणीही नाकारू शकत नाही.
मला कल्पना आहे की, त्यांना त्यांच्याबदल स्तुतीपर बोलणे व लिहिणेही आवडणार नाही किंवा त्यांना आपण काही सूचना करणे योग्य ठरणार नाही. परंतु समस्त मराठी भाषेच्या वाचकांच्या दृष्टीने रंगनाथ पठारे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होणे व पाहणे आपणा सर्वांना आवडेल. त्याकरिता आम्ही सर्वसामान्य वाचक म्हणून त्यांची परवानगी न घेता या कामाची सुरुवात करीत आहोत. इतका ताकदीचा उत्तम मराठी लिहिणारा माणूस यावर्षीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावा याकरिता प्रयत्न तर करू या! आपणा सर्वांच्या वतीने आरोग्याकरिता त्यांना उत्तम शुभेच्छा! मराठी माणसांना उत्तम पुस्तकांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
– विष्णुपंत गायखे
अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, पळसे 9373191358
Famous Ranganath Pathare
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…
या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…