गौळाणे फाट्यावर बैलगाडीसह रास्ता रोको
सिडको : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. या रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या
शेतकर्यांनी मंगळवारी (दि. 16) गौळाणे फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवला.
भूसंपादन प्रक्रियेत होत असलेल्या कथित अन्याय आणि अपुर्या मोबदल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर व शेतकरी नेते कैलास खांडबहाले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात परिसरातील अनेक गावांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बैलगाडीसह करण्यात आलेल्या या आंदोलनाने विशेष लक्ष वेधून घेतले.
शेती आणि शेतकर्यांच्या अस्तित्वावर घाला घालणार्या धोरणाविरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलकांनी पारंपरिक बैलगाडी महामार्गावर आणून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. योग्य भरपाई, पुनर्वसनाची हमी आणि पारदर्शक प्रक्रिया राबविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
दरम्यान, महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन शांततेत पार पडले. दरम्यान, शेतकर्यांची लेखी संमती, न्याय्य मोबदला आणि पारदर्शक भूसंपादन प्रक्रिया सुनिश्चित होईपर्यंत रिंगरोड प्रकल्पाला विरोध सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दातीर, खांडबहाले व आंदोलक शेतकर्यांनी घेेतली आहे.
Farmers’ protest against the ring road
भिवंडी/शहापूर : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बालाजीनगर भागातील कोहिनूर ही चार मजली इमारत कोसळल्याची…
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…