भारतीय समाजाच्या जडणघडणीत संत, विचारवंत व समाजसुधारक यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अंधश्रद्धा, जातिभेद, दारिद्र्य व अस्वच्छता यांसारख्या सामाजिक दुर्गुणांविरुद्ध आवाज उठवून समाजाला योग्य दिशा देणार्या थोर संतांमध्ये संत गाडगेबाबा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी आपल्या कृतीतून व विचारातून समाजसेवेचा आदर्श उभा केला. संत गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शेणगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे मूळचे नाव डेबूजी होते. पण त्यांच्या विचारांमुळे आणि अतिशय साध्या राहिणीमुळे त्यांना गोधडी महाराज, चिंधे बुवा इत्यादी विविध नावांनी ओळखले जायचे.
संत गाडगेबाबा हे कर्मयोगी संत होते. त्यांनी कधीही प्रवचने देऊन उपदेश करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून समाजाला शिकवले. गावोगावी फिरून ते स्वच्छतेचे महत्त्व सांगत आणि स्वतः झाडू घेऊन रस्ते, देवळे, धर्मशाळा स्वच्छ करत. दारू पिणे, व्यसनाधीनता, जातिभेद व अंधश्रद्धा यांना त्यांनी तीव्र विरोध केला. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी आपल्या कीर्तनांतून व भजनांतून शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी जमा केलेला पैसा स्वतःसाठी न वापरता धर्मशाळा, शाळा, अनाथालये, रुग्णालये व सार्वजनिक विहिरी यासाठी दिला. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण व मागास भागातील जनतेला नवी दृष्टी मिळाली. गाडगेबाबांच्या महान चमत्काराचे रहस्य म्हणजे त्यांनी अंगीकारलेला स्वच्छता धर्म, स्वच्छता धर्माचा सूर्य म्हणजे गाडगेबाबा आजच्या युगात सर्वाधिक दुर्मिळ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वच्छ माणूस.
झिंगराजी जानोरकर यांचा मुलगा डेबूजी पुढे गाडगेबाबा होईल, हे कोणालाच माहीत नव्हते. झिंगराजी परिवाराचे मूळ काम लोकांचे कपडे स्वच्छ ठेवायचे होते. पण लोकांच्या स्वच्छ कपड्यांच्या आत जर मळलेली मने असतील तर त्या स्वच्छ कपड्यांची किंमत शून्यच. बाहेरून स्वच्छ कपडे परिधान केलेली माणसे अजून आतून अस्वच्छ असल्यामुळे माणसामाणसांत संघर्षाचे डोंगर उभे राहतात. माणसाने माणसाशी माणसांसारखे वागावे, हा विचार कृतीतून लोकांना पटवून देत होते. गाडगेबाबा एक निरक्षर व्यक्ती होते, पण सार्या माणसांवर प्रेम करण्याचा विद्येचा सुकाळ करावयाचा होता. त्यांना माणसांवरचे काय, पण ते गाय, बैल, कीटक, मुंग्या या सार्यांवर प्रेम करीत होते. या मानवतेवर प्राण्यांवर उगारणार्या हातापेक्षा सावरणारे हात श्रेष्ठ असतात. गाडगेबाबांचे सारे जीवन हातांच्या कामाचे जीवन होते. हातात खराटा घेऊन लोकांच्या विकासासाठी सुंदर धर्मशाळा बांधणे हजारो लोकांच्या मुखी घास भरवणे हे तर गाडगेबाबांच्या हाताचे खरे महाकाव्य होय. माणसं काम केले की पैसे मागतात. गाडगेबाबांनी सार्या समाजाचे काम केले, पण एक पैसाही मागितला नाही. जेव्हा काम करूनही कामाचे पैसे मागितले जात नाहीत त्यास सेवा म्हणतात. गाडगेबाबांनी असा सेवाधर्म अखंड पन्नास वर्षे पाळला.
खेड्यापाड्यांतून समाजाची सेवा करत लोकजागृती करणे, हेच आयुष्याचे ध्येय त्यांनी मानले. मला कुणी गुरू नाही आणि मी कोणाचाही गुरू नाही हीच भावना ठेवून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता या समाजाच्या विरुद्ध गतीतून बहुजन समाज बाहेर पडावा म्हणून त्यांची सतत धडपड असे. हातात खराटा घेऊन बाबा स्वतः गावाची स्वच्छता करून लोकांना धडा घालून देत असत. संत गाडगेबाबांंनी साधेपणा, परिश्रम व सेवाभाव या मूल्यांच्या आधारे समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांनी शब्दांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व दिले. स्वच्छता, शिक्षण, समता व मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. आजच्या काळातही संत गाडगेबाबा यांचे विचार तितकेच मार्गदर्शक आहेत.
संत गाडगेबाबा महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते. स्वच्छता, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि सामाजिक समतेचा त्यांनी अखंड प्रचार केला. कीर्तन, भजन आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी समाजाला जागृत केले. त्यांच्या कार्यातून गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांमध्ये आत्मसन्मान व प्रगतीची जाणीव निर्माण झाली. संत गाडगेबाबांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. 20 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबांचे निधन झाले. स्वच्छता, शिक्षण आणि मानवतेचे मूल्य जपून समाजहितासाठी कार्य करणे, हीच त्यांच्या पुण्यस्मरणाची खरी भावना आहे. त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करून सामाजिक बांधिलकी जोपासणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
Great social reformer Saint Gadge Baba
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…