नाशिक

निफाड पूर्व भागात अवकाळीसह गारपीट

कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका पिकांचेे नुकसान; पंचनाम्याची मागणी

भाग बदलून पावसाची हजेरी.
वार्‍यामुळे द्राक्षबागांचे नुकसान.
उघड्यावरील बेदाणाही भिजला.
नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हतबल.
तातडीने मदतीची मागणी.
ठोस उपाययोजनांची गरज.

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी (दि.2) दुपारनंतर अचानक झालेल्या वादळी वार्‍याबरोेबर गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या पावसासोबत काही ठिकाणी तुरळक, तर अनेक ठिकाणी सुपारीच्या आकाराच्या गारा पडल्याने कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस भाग बदलत हजेरी लावत असल्याने हातात आलेली पिके वाया जात आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

निफाडसह कोठुरे, जळगाव, शिवरे, नैताळे, खानगाव थडी, सारोळे थडी, यासह तालुक्याच्या पूर्व भागातील देवगाव, कानळद, कोळगाव, वाकद, शिरवाडे, मानोरी, भरवस, वाहेगाव, नांदगाव, डोंगरगाव, धारणगाव, खेडलेझुंगे या गावांमध्ये जोराच्या वार्‍यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी द्राक्षेघडांना फटका बसला आहे. डाळिंब बागांमध्ये फळगळ झाली आहे. कांदा पिकावर पावसाचे पाणी साचल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. गहू व मका पिकांनाही पावसाचा मोठा फटका बसल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दिंडोरी तास आणि नांदूरमध्यमेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यात गारा बरसल्याने परिसरातील कांदा व गहू पीक भुईसपाट झाले आहे. बेदाणा बनविणार्‍या व्यावसायिकांचा उघड्यावर असणार बेदाणा पावसामुळे ओला झाला. त्यामुळे या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करणे म्हणजे कर्जाचा डोंगर उभा करण्यासारखे झाले आहे. अशा परिस्थितीत तरुण शेतकरी शेतीकडे पाठ फिरवतील, अशी भीती व्यक्त होत आहे. कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई जाहीर करावी.
सद्य:स्थितीत शेतकरी हवालदिल झाला असून, त्वरित मदत मिळणे अत्यावश्यक आहे. महसूल व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून बाधित शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वारंवार होणार्‍या अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाचा फटका माझ्या कांदा पिकाला बसला आहे. गारांमुळे उरल्यासरल्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. कांदापीक पूर्ण भुईसपाट झाल्याने कांदा पिकावर झालेला खर्च निघणार नाही. शासनाने पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी.
-सचिन जाधव, शेतकरी, दिंडोरी तास

Hailstorm with thunderstorm in eastern Niphad

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भुजबळ- जरांगेंमध्ये पुन्हा जुंपली

आरक्षण जीआरवरून एकमेकांवर टीका मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री…

5 minutes ago

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

21 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

21 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

21 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

21 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

21 hours ago