लोकहितवादी मंडळाकडून छगन भुजबळ यांचा सन्मान

समूहिक प्रयत्नांतून  साहित्य संमेलन यशस्वी – छगन भुजबळ

नाशिक,

लोकप्रिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नाशिक महानगपालिका आणि समस्त नाशिककरांचा हातभार लागल्याने नाशिकमध्ये पार पाडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे. पुन्हा जर साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी नियोजन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्याबद्दल भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक असलेल्या लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून छगन भुजबळ यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. साहित्य संमेलनात नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांमुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी नाशिकच्या जनतेचे आभार मानावे तितकेच कमी असल्याचे सांगत पुन्हा नाशिकला संमेलन होणार असल्यास नाशिककरांच्या वतीने स्वागतच असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, डॉ.प्रशांत पाटील, भगवान हिरे, प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, किरण समेळ, फणिंद्र मंडलिक, चंद्रकांत दिक्षित, मुक्ता बालिका, अपूर्वा सौचे, सागर पाटील, आदित्य समेळ, विक्रम सोनवणे, तेजस कुलकर्णी, अमोल जोशी, अजिंक्य कुलकर्णी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

21 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

40 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

46 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

56 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago