पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
लग्नाच्या वेळी स्वतःला बँकेत कॅशियर असल्याचे खोटे सांगून फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर तसेच सासरच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना देवळाली गावातील वडारवाडी येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृत विवाहितेचे नाव निशा राजू पवार (वय 23, रा. वडारवाडी, देवळालीगाव) असे आहे. याप्रकरणी तिचे भाऊ राहुल अशोक शिंदे (वय 28, रा. नाशिक वेस, बारादरी रोड, सिन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती राजू गंगाराम पवार, अमोल राजू गायकवाड आणि सविता पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशाचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राजू पवार याच्याशी झाला होता. विवाह ठरविताना राजू याने आपण एसबीआय बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. मात्र, विवाहानंतर तो प्रत्यक्षात एका मॉलमध्ये काम करत असल्याचे समोर आले. या फसवणुकीमुळे आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे निशा नैराश्यात गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, 28 जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास निशा हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 108, 319(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी राजू गंगाराम पवार (वय 27) आणि अमोल राजू गायकवाड (वय 30, रा. राणेनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अटकेची प्रक्रिया सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करत आहेत.
Newlywed woman commits suicide after providing false information about her job at the time of marriage.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…