नाशिक

धरण समूहात अवघा 31.59 टक्के साठा

जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानात मोठी वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील धरणांतील साठ्याचे बाष्पीभवन होऊन पाणीपातळी खालावत असल्याचे चित्र आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील धरण समूहात अवघा 31.59 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यात अधिक तीव्र झाल्या आहेत. जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, अनेक तालुक्यांत प्रशासनाच्या वतीने टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाई असलेल्या गाव-खेड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. मात्र, यंदा उन्हाळा तीव्र असल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होऊन पातळीत खालावली जात आहे. अनेक धरणे कोरडीठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.

गंगापूर धरणात 42.38 टक्के पाणी

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 42.38 टक्के साठा आहे. परिणामी शहरातदेखील पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थाच्या विकासकामांसाठी अनेक भागांत खोदकाम सुरू असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जूनमध्ये नियोजित वेळेत जर पाऊस झाल नाही, तर यंदा जिल्ह्याला मोठ्या पाणीटंंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धरण समूहातील पाणीसाठा

गंगापूर धरण समूह – 47.07
पालखेड धरण समूह – 22.14
ओझरखेड – 26.78
दारणा – 26.15
भोजापूर – 71.19
गिरणा खोरे धरण समूह – 34.36
एकूण धरणसाठा – 31.59

Only 31.59 percent of the reservoir is in the dam complex.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

5 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

21 minutes ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

22 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

22 hours ago

समाजाची अधोगती…

गेल्या आठवड्यात नातेवाइकाच्या लग्नाला गेलो होतो. खरेतर लग्न कसले, फक्त वैताग. जावे लागते म्हणून लोक…

22 hours ago

मनमाड एसटी आगारात प्रवाशाची अडवणूक

सवलत पाससाठी जादा पैसे उकळल्याचा ज्येष्ठ नागरिकाचा आरोप मनमाड : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या…

22 hours ago