नाशिक

नाशिक जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज  अलर्ट

 

नाशिक जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज  अलर्ट

अतिमुसळधार पावसाचा अंदाज

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्यात   शनिवार दि.16 व  रविवार 17 सप्टेंबर  रोजी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असुन मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिक जिल्हयासह शहरात पावसाचे मागील आठवड्यात  दमदार कमबॅक  झाले. दोन दिवस झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली.  मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर शहरात काल शुक्रवार  सायंकाळच्या सुमारास  पावसाने हजेरी लावली होती.  त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र होते.यंदा पावसाळ्यातले  दोन महिने उलटून गेले तरी पावसाने ओढ दिल्याने पाणीकपातीचे संकट नाशिककरांवर ओढवण्याची शक्यता होती.   मात्र मागील आठवड्यात  झालेल्या पावसाने जिल्हावासियांना दिलासा मिळाला असला तरी पिकांसाठी  पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाच्या अंदाजाने शेतकरी सुखावला आहे.

गणरायाचे स्वागत पावसात

येत्या दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज  वर्तवण्यात  आला असल्याने  लाडक्या बाप्पाचे स्वागत पावसात करावे लागणार आहे. त्यामुळे  गणेश भक्तांकडून बाप्पांच्या स्वागताची आधीच तयारी करण्यात येत आहेत.

असा आहे अंदाज

16 व 17 सप्टेंबर रोजी  ऑरेंज  अलर्ट असुन मुसळधार व अतिमुसळधार  पावसाचा अंदाज  आहे .तर 18 व 19 सप्टेंबर रोजी  ग्रीन अलर्ट असुन    मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्याला मिळणार दिलासा
नाशिक जिल्ह्यात  मागील आठवड्यात मुसळधार  पाऊस झाल्याने धरणे ओव्हर फ्लो झाली होती.   त्यामुळे गंगापुर ,नांदुरभधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास  धरणातून   पुन्हा पाण्याच  विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याने  जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago