मनोरंजन

राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ‘इथे’ होणार

मुंबई : प्रतिनिधी  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी  केली.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताचे औचित्य साधून कोल्हापूर येथे या स्पर्धा घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली होती. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतींना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य व राजर्षी शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी या निमित्ताने कोल्हापूर मधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिनांक ६ मे २०२२ पासून हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी दिली.

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या १९ केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३५६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी प्राथमिक फेरीतील ३४ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी प्रयोग सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

17 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

36 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

43 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

52 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago