पंचवटी : प्रतिनिधी
दरीआई माता देवस्थान परिसरातील डोंगरावर दि. 1 जून 2026 रोजी सायंकाळी पुन्हा भीषण वणवा लागला होता. हा गेल्या काही दिवसांतील याच भागातील सलग सातवा वणवा असल्याने प्रशासनाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी दरीआई माता वृक्षमित्र परिवार, राह फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली आहे.
वन विभाग, दरीआई माता वृक्षमित्र परिवार, अनेक संस्था, तसेच स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षे मेहनत घेऊन जगवलेली शेकडो झाडे, तसेच मोर, ससे, पक्षी, सरडे यांसह विविध वन्यजीव या आगीत होरपळून गेले आहेत.
जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक वन्यजीव बेघर झाले आहेत. 14 मे रोजी पिंपळ टेकडीला लागलेल्या वणव्यातून परिसर अजून सावरत असतानाच पुन्हा आग लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. दरीआई माता वृक्षमित्र परिवार व राह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व वणवा आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
सलग सात वेळा एकाच भागात वणवे लागणे हा निव्वळ योगायोग नसून घातपात असल्याचा स्थानिक नागरिक व पर्यावरणमित्रांनी संशय व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या मागण्या अशा…
1. घटनेचा तातडीने पंचनामा करून अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करावा. 2. पिंपळ टेकडी, लोखंडे वस्ती व दरीआई माता डोंगर परिसरात कायमस्वरूपी गस्त सुरू करावी व सीसीट्रॅप कॅमेरे बसवावेत. 3. दोषी आढळणार्यांवर भारतीय वन कायदा 1927 व भारतीय दंड संहिता कलम 435 अंतर्गत कठोर कारवाई करावी.
दरी ग्रामस्थांना आवाहन
दरीआई माता वृक्षमित्र परिवाराने सर्व दरीकर नागरिकांना आवाहन केले आहे की, आपला डोंगर आपणच वाचवायचा आहे. सर्वांनी जागरूक राहून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. आग किंवा धूर दिसल्यास तत्काळ संपर्क साधा. वन विभाग टोल फ्री क्रमांक : 1926, अग्निशमन दल : 101, दरीआई माता वृक्षमित्र परिवार, राह फाउंडेशन.
Seventh consecutive severe wildfire in Dariai Mata mountain area; Demand for action
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…