पशुपालकांसह पाळीव जनावरांनी परिसर गजबजून गेला
निफाड : तालुका प्रतिनिधी
यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीपातळी झपाट्याने घटली. परिणामी, पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. तर जानेवारीपासूनच चाराटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे पशुधन सांभाळण्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातील पशुपालक
शेळ्या-मेंढ्या घेऊन सहकुटुंब निफाडच्या गोदाकाठ भागात डेरेदाखल झाले असून, या पशुपालकांसह पाळीव जनावरांनी हा परिसर गजबजून गेला आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नदी-नाले शुष्क झाले. साहजिकच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. तर यावर्षी जानेवारीपासूनच चाराटंचाईचा सामना करावा लागल्याने शेजारील मालेगाव, येवला, नांदगाव, तालुक्यांसह धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात पशुपालक आपली जनावरे घेऊन निफाडच्या गोदाकाठ परिसरात दाखल झाले आहेत. परिणामी गोदाकाठच्या सायखेडा, चांदोरी, निफाड, म्हाळसाकोरे, शिंगवे, खानगावथडी, कोळगाव, कानळद आदी गावांच्या शिवारात हे पशुपालक जनावरे चारताना तसेच आपले बिर्हाडसह मुक्कामी थांबलेले दिसतात.
Shepherds camp on the banks of the river in search of fodder and water.
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…
सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्यांचे…
नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…
गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…
आज 20 मे, जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. अँतोन जोंसा या जगप्रसिद्ध मधुमक्षिकापालन…
सिन्नर-नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर सुरू झालेली चर्चा थांबलेली…