– आशा नवले
माणसांनी नेहमी एकटेपणा बरोबर मैत्री करावी. म्हणजे त्याला कशाचे दुःख होत नाही. एकटे असताना माणूस अनेकदा स्वताशीच बोलत असतो. तोच असतो वक्ता आणि तोच असतो श्रोता. तोच असतो परीक्षक आणि तोच असतो परीक्षार्थी. माणसात किती राहणे आवडली तरी प्रत्येकाला एकांत प्रिय असतो.मग काही वेळा साठी असो नाही तर कायमचा. प्रत्येकाची एकटे राहण्याची कारण वेगवेगळी असतात. म्हणून एकटा राहणार माणूस हा माणूस घाणा असतो असे नाही. प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आजूबाजूला असलेल्या वाता वरणा नुसार घडत जाते. जन्मापासून अनेक गोष्टीचा सामना करत असतो. त्यातून त्याचे रूप समाजाला दिसत असते. पण न दिसणारे एक रूप प्रत्येकाचे असते. ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला स्वतःलाच माहिती असते. एकटे असताना ते त्याला आवडते. कोणता नकली मुखवटा धारण न करता तो जसा आहे तसा स्वतः समोर येतो म्हणून माणसाला एकांत आवडतो. मन दुःखी आहे पण चारचौघात रडता येत नाही म्हणून बंद पापण्या आड तो अश्रू लपवतो. पण तोच एकटा असताना ओक्साबोक्शी रडतो. कोणी मन दुखावले त्याला जाब विचारता येत नाही मग स्वतःच स्वताला प्रश्न करत राहतो. त्याचे उत्तर स्वतःच शोधतो. म्हणून एकांतसुद्धा छान मित्रच असतो.

Solitude

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दागिने बळकावणारा तोतया डेप्युटी मॅनेजर गजाआड

महिला साथीदारही अटकेत; उपनगर पोलिसांत गुन्हा नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी फायनान्स कंपनीत डेप्युटी मॅनेजर असल्याची…

7 minutes ago

कर्करोग हा अधिसूचित आजार घोषित करा

सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश; देशभरात एकसमान आरोग्य धोरण असावे नवी दिल्ली : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने…

19 minutes ago

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हा पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना ‘हर घर तिरंगा’…

23 minutes ago

‘समाजकार्य’ला स्वतंत्र विद्याशाखेची मान्यता

मंत्रिमंडळाचा निर्णय : शिक्षण, ऊर्जा क्षेत्राला चालना मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

35 minutes ago

राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील ‘येवला पैठणी’ला आता…

40 minutes ago

पाऊसधारा

- अमोल जगताप गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावरची आंब्यांची…

20 hours ago