नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षात नेमके काय होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असतानाच आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली,या सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले.
16 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, या याचिकेची सूनवणी होण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती रमांनी यांच्या अध्यक्षतेखाली 3 जणांचे घटनापीठ नियुक्त करण्यात आले होते, या घटना पिठात आज सुनावणी झाली, शिवसेनेच्या वतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली,
उपसभापती नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपत्रतेच्या नोटिसा बजावल्या आहेत, या दरम्यान राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, राज्यात स्थापन झालेले सरकारच बेकायदेशीर असल्याची एक अशा एकूण वेगवेगळ्या चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत या सर्व याचिकांवर आज एकत्रित सुनावणी झाली, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाकडे आठवडाभराची वेळ मागितली होती, यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आता या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…