नाशिक

सिंहस्थामुळे त्र्यंबकरोड होणार हरित

जागतिक पर्यावरण दिन : बेल उद्यान जागेअभावी बारगळले

नाशिक  : देवयानी सोनार
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एप्रिल 2023 मध्ये राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी पंचायतन, अमृत आणि बेल वनोद्यानाची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही राज्यातील अनेक जिल्ह्यांत अणि शहरांत, धार्मिक स्थळांवर ही उद्याने प्रत्यक्षात साकारलेली नाहीत. बागलाणचा अपवाद वगळता त्र्यंबकेश्वर येथे बेलवन करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, जागा न मिळाल्याने हे बेलवन प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही.

नेमकी योजना काय आहे?
पंचायतन वनोद्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 25 गावांत वड, उंबर, पिंपळ, बेल आणि देशी आंबा लावून ती उद्याने उभारण्याचे उद्दिष्ट होते.
अमृत वनोद्यान प्रदूषण रोखण्यासाठी आणि तापमानातील वाढ कमी करण्यासाठी राज्यातील 75 शहरांत औषधी व दुर्मिळ वनस्पतींची लागवड करायची होती.
बेल वनोद्यान सद्यःस्थितीतील असुरक्षित असलेल्या बेलाचे संवर्धन करण्यासाठी राज्यातील 75 धार्मिक व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी ही वने साकारण्यात येणार होती. मात्र, काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नेमके घोडे अडले कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. 13 एप्रिल 2023 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयाने अत्यंत तातडीचे पत्र काढून सर्व अधिकार्‍यांना 17 एप्रिल 2023 पर्यंत उद्यानांसाठी जागांची निवड करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शासन निर्णयानुसार या उद्यानांच्या पूर्वतयारीची आणि लागवडीची कामे सन 2023-24 याच वर्षात पूर्ण करणे बंधनकारक होते.
या योजनेचा कालावधी पुढील सात वर्षे म्हणजेच सन 2023-24 ते 2029-30 असा निश्चित करण्यात आला होता. उद्याने उभारणी आणि त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागावर सोपवण्यात आली होती. मात्र, लागवडीच्या वर्षातच जर कामे झाली नसतील तर पुढील सात वर्षे देखभाल कसली आणि कोणत्या झाडांची केली जाणार, असा प्रश्न निर्माण
झाला आहे.

निधी गेला कुठे?
या उद्यानांसाठी शासकीय तिजोरीतून निधीची तरतूद करण्यात आली होती, तसेच व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) व अशासकीय संस्थांच्या मदतीने खर्च करण्याचे आदेश होते. जर उद्याने उभी राहिलीच नाहीत तर हा मंजूर झालेला निधी नक्की गेला कुठे? जागांचे काय झाले? वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या उद्यानांसाठी 0.5 ते 5 हेक्टरपर्यंतच्या जमिनी निवडायच्या होत्या. ही जागानिश्चिती प्रक्रिया पूर्ण झाली आहे का? याबाबत शासन पातळीवर सध्या तरी उत्तरे देण्याऐवजी टोलवाटोलवी केली जात आहे.

बेलवन प्रस्तावित नाही
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंंगाने स्थानिक प्रजाती जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध नाही. परिणामी, शेतकर्‍यांना प्रोत्साहित करून रस्त्यांच्या कडेने रोपे लावणार आहे. नरेंद्रनाथ महाराजांनी गेल्या वेळी दहा हजार रोपांची लागवड केली होती. तसे अनेक जण भाग घेणार आहेत. स्थानिक ग्रामस्थ, शासकीय-निमशासकीय संस्था, देवस्थाने आणि आखाडे यांच्या सहभागाने वड, उंबर, कवठ, पिंपळ, प्रामुख्याने बेल, रुद्राक्ष या झाडांची रोपे लोकसहभागातून करण्याचा मानस आहे. रिंगरोड व इतर रस्त्यांच्या कडेला संबंधित एजन्सीलाही रोपे लावण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. सध्या तरी बेलवन प्रस्तावित नाही.
– गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, वन्यजीव विभाग

बेलवनासाठी त्र्यंबकेश्वर योग्य
अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या पाच जिल्ह्यांत बेल वनोद्यान साकारण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असल्याने धार्मिक महत्त्व अधिक आहे. बेल वनोद्यान निर्मितीचा शासन आदेश 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार त्र्यंबकेश्वरला बेल वनोद्यान पुढील वर्षापर्यंत साकारले जाण्याची शक्यता होती; परंतु जागाच मिळाली नाही. त्यासाठी जागेचा शोध घेण्यास सांगितले होते. परंतु, जागाच न मिळाल्याने हे बेलवन प्रत्यक्षात साकार होऊ शकले नाही.

विभागनिहाय बेलवन आणि कंसात लावलेली रोपे
नाशिक : 01                             दोधेश्वर (200)
अहिल्यानगर : 03                   पारनेर (400),     कोपरगाव (160),
नेवासा (160)
धुळे : 02                                  साक्री (400),      शिरपूर (400)
जळगाव : 02                           एरंडोल (400),     भुसावळ (400)
नंदुरबार : 02                           नंदुरबार (800),  चिंचपाडा (800)

Trimbak Road will be green due to Simhastha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

9 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago