महाराष्ट्र

महायुतीत अस्वस्थता; ‘मोठ्या भावा’कडून कोंडी?

सत्तार, गायकवाड ते गुलाबराव पाटलांपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेत भाजपविरोधात असंतोष

मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या 17 जागांची निवडणूक घातली असतानाच, महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.
जागावाटपात भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर मित्रपक्षांकडूनच झालेली अंतर्गत बंडखोरी यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांमध्ये भाजपविरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. आधी मंत्री अब्दुल सत्तार, त्यानंतर आमदार संजय गायकवाड आणि आता थेट जळगावातून कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे, भाजप जाणीवपूर्वक शिवसेनेची कोंडी करून पक्ष संपवू पाहत आहे, अशी भावना बळावत चाललेली दिसत आहे.
भाजपाने 17 जागांपैकी स्वतःकडे 11 जागा घेतल्या, तर शिवसेनेची सात जागांची मागणी उडवून लावतील अवघ्या चार जागा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. जागांच्या या वाटणीमुळे शिवसैनिकांमध्ये आधीच नाराजी होती. त्यात भर म्हणून शिवसेनेला मिळालेल्या मोजक्या जागांवरही अंतर्गत बंडखोरी घडवून आणल्याचे चित्र आहे. नाशिकच्या उत्तर महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या जागेवर ही कोंडी प्रकर्षाने समोर आली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष बंडखोरी जाहीर केली आहे. जळगावातही मोठी खदखद आहेच. जळगावातील हक्काची जागा शिवसेनेला हवी असताना, भाजपने ती स्वतःच्या पारड्यात पाडून घेतली. या सातत्यपूर्ण डावलणुकीमुळे, सोबत राहून पाठीत खंजीर खुपसला जात आहे, अशी भावना शिवसेना आमदारांमध्ये एकापाठोपाठ एक येणार्‍या वक्तव्यांमधून स्पष्टपणे उमटू लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांमधील ही खदखद सर्वात आधी छुप्या पद्धतीने आणि आता थेट जाहीर वक्तव्यांमधून बाहेर पडत आहे. अब्दुल सत्तार यांचा पहिला आक्षेप: अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील विकासनिधी आणि स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांकडून होणार्‍या हस्तक्षेपाबाबत जाहीर व्यथा मांडत महायुतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
जळगावात गुलाबराव पाटलांचा थेट असहकार- या संपूर्ण वादाचा सर्वात मोठा स्फोट नाशिकसह जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून होताना दिसत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे ही जागा शिवसेनेला सुटावी आणि तेथून त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते. मात्र, भाजपने स्थानिक पातळीवर कोणतीही चर्चा न करता नंदकिशोर महाजन यांची उमेदवारी जाहीर केली.या एकतर्फी निर्णयामुळे संतापलेल्या गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील इतर शिवसेना आमदारांनी थेट बंड पुकारत भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे पूर्णपणे पाठ फिरवली. मंत्र्यांनीच उघडपणे असहकार पुकारल्याने भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. अखेर डॅमेज कंट्रोलसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांना थेट गुलाबराव पाटलांचे गाव ’पाळधी’ गाठावे लागले. तेथे बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर हा वाद शमवण्याचा प्रयत्न झाला असला, तरी भाजप शिवसेनेची कोंडी करत आहे हा संदेश संपूर्ण राज्यभरात गेला आहे. भाजपवर सडकून टीका करताना गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, महायुतीमध्ये सोबत असताना जागावाटपात विश्वासात घेणे अपेक्षित होते, मात्र भाजपने स्वतःच्याच सोयीचा निर्णय घेत शिवसेनेवर अन्याय केला आहे. मित्रपक्षाला कमकुवत करण्याच्या कथित प्रवृत्तीमुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

आमदार गायकवाड यांचा पाठिंबा

सत्तार यांच्या या नाराजीला बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर दुजोरा दिला. गायकवाड यांनी थेट माध्यमांसमोर सांगितले की, अब्दुल सत्तार जे बोलले ते 100 टक्के सत्य आहे. आमच्या हक्काच्या मतदारसंघात मित्रपक्ष जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

Unease in the Grand Alliance; Confusion from ‘Big Brother’?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

6 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago