जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील जाडगाव फाट्यावर शुक्रवारी (दि. 5) दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव व अनियंत्रित स्कॉर्पिओ जीपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे.
मूळचे मलकापूर येथील रहिवासी असलेले आणि वरणगाव परिसरातील रहिवासी असलेले हे आदिवासी पारधी कुटुंबातील सदस्य दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. स्थानिकांंनी जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिघांना मृत घोषित केले, तर चौथ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार विजय शंकर काळे (वय 19), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय 30), विघ्नेश शंकर चव्हाण (वय 14) आणि अवघ्या एक वर्षाची निष्पाप चिमुरडी मोनालिसा शिवबसप्पा भोसले या चौघांना जीव गमवावा लागला आहे.
Four of a family killed in collision with speeding Scorpio
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…