महाराष्ट्र

मुलांच्या दप्तरात दडलयं काय ?

नाशिक ः प्रतिनिधी
शाळा महाविद्यालयातील मुलांच्या दप्तरात नक्की दडलयं काय याची पालकांसह शिक्षकांनाही कल्पना नसते.दप्तरात अभ्यासाच्या पुस्तकवह्यांशिवाय अजून काय असणार असे म्हणणारे पालकही आहेत.परंतु जेव्हा अशा काही घटना घडतात कि विचार करायची वेळ येते शालेय महाविद्यालयीन मुलांजवळ अशा गोष्टी आल्या कशा कुठून.नुकतेच पुणे येथे एका मुलाने मैत्रीणीशी का बोलला म्हणून दप्रातील कोयता उगारला.शहरातील नामांकित महाविद्यायातील दोन मुलींचे बॉयङ्गे्रंडवरून भांडणात ङ्गायटरचा उपयोग करून हाणामारी झाली.त्याशिवाय सिन्नर येथील घाटात चार विद्याथ्यांचा अपघाती मृत्यू झाला.तत्पूर्वी ङ्गिरण्यासाठी जायचे तर गणवेशात ओळखले जाऊ म्हणून दप्तरात बदलण्यासाठी कपडे सोबत घेवून निघाले होते.या घटना उघडकिस आल्यामुळे पालकांसह शिक्षक आणि समाजात कळाले यांमुलांजवळ हत्यारे,कपडे दप्रात जवळ बाळगले होते.परंतु अजूनही पालकही अनभिज्ञ आहेत.

 

 

 

 

बारा ते पंचवीस वयोगटातील मुलांच्या दप्तरात महागड्या वस्तु घड्याळ,मोबाइल,खेळणी तसेच चाकू,ब्लेड,गुटखा,मावा,तंबाखू आदी वस्तु आढळतात.मुलांचे तंबाखु,गुटखा खाण्याचे प्रमाण 20 ते 30 टक्के वाढले आहे.पालकांच्या परवानगी नसतांना किंवा गैरहजेरीत वाहने सुसाट पळविली जातात.शाळा,कॉलेजला न जाता हुल्लडबाजी,टिंगलटवाळी करतांना आढळतात किंवा सिनेमा,सामुदाईकपणे मोबाइल गेम खेळतांना आढळून येतात.
त्याशिवाय मुले शाळेच्या आवारात न दिसेल अशा ठिकाणी कपडे बदलून बाहेर सहल,ट्रेकिंग,हॉटेलींग,सिनेमा यासाठी बाहेर पडतात.मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवून अशा गोष्टीकडे आकर्षीले जात आहेत.त्यामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर,पुढील आयुष्यावर परिणाम होतांना दिसून येत आहे.

 

 

 

 

एक चांगला नागरिक घडविण्यामध्ये शिक्षकांची मोठी भूमीका असते असे नेहमीच म्हटले जाते परंतु व्यावसायीकरण,स्पर्धात्मक वातावरण सततचा तणाव,अशा गोष्टीसंह विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सामोरे जावे लागते.त्यामुळे मुलांशी कमी झालेला संवाद चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी मेहनत घेणारे शिक्षक अभावानेच आढळतात.
व्यस्त जीवनशैलीत पालकांना मुल वाढवितांना कसरत होते. वेळे अभावी पालकांना मुलांचे दप्तर तपासणे शक्य होत नाही. अगदीच नर्सरी ते पाचवी पर्यंतच्या मुलांच्या दप्तरे पालकच भरून देत असतात.मात्र मुले जशी मोठी होतात तशी स्वतः स्कूल बॅग,दप्तर भरतात.घरातील आईवडिल नोकरी व्यवसायानिमित्त थोडाच वेळ मुलांसोबत असतात.त्यामुळे पालक मुलांना योग्य सूचना करीत मुलांना शाळा महाविद्यालयात पाठवितात.

 

 

 

 

 

मुलांना नकळत्या वयात चूकीची माहिती,संगत,आजूबाजूचे वातावरण,दडपण,भिती,तणाव,अभ्यासाचा कंटाळा अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मुले कधी व्यसनाधीनतेकडे,गुन्हेगारी कडे वळतांना दिसतात.घरातील किंवा महाविद्यालयीन वातावरण असुरक्षित किंवा तणावाचे स्पर्धात्मक असल्या कारणामुळे मुलांमध्ये असुरक्षित भावना निर्माण होते.पालकांना शिक्षकांना विश्वासात न घेता चुकीच्या गोष्टीकंडे वळतात.मित्र मैत्रिणीसोबत शाळा महाविद्यालयाच्या वेळेत बाहेर ङ्गिरायला जाणे.पार्टीज करणे,साहसी पर्यटन करणे,टे्रकिंगला जाणे आदींचे प्रमाण वाढते आहे.त्याशिवाय व्यसन करण्याकडेही कल वाढलेला दिसून येत आहे. दप्तरात गुटखा,तंबाखूजन्य पदार्थ,सिगारेटसह गर्भनिरोधके,गोळ्यांही सापडल्याचे अनेकदा घटना घडल्या आहेत.
किशोरवयीन मुलामुलींचा संवाद पालकांशी हरवत चालल्याची खंत समुपदेशक सांगतात.तर शिक्षक विद्यार्थी यांनाही शिक्षण घेण्यापुरते मर्यादित ठेवले जात असल्याचे चित्र आहे.

 

 

 

 

 

मुलांच्या दप्तरात आक्षेपार्ह वस्तु आढळतात.पालकांचे दुर्लक्ष होत आहे.शाळा कटाक्षाने मुलांच्या दप्तराची तपासणी वर्गशिक्षकांकडून केली जाते.आक्षेपार्ह वस्तु आढळल्यास काढून घेत पालकांना याबाबत कळविले जाते.पालकांकडून लेखी घेवून समज दिली जाते.पालकांनी वर्गशिक्षकांना वारंवार येऊन भेटणे आणि समन्वय ठेवणे गरजेचे आहे.
एस.बी देशमुख
सचिव नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ

 

 

 

 

 

आजकालच्या धावपळीच्या जगात आई वडील दोघेही व्यस्त असतात त्यामुळे मुलांसोबत पाहिजे तेवढा संवाद होत नाही. आपले पाल्य शाळेत किंवा कॉलेजला जाते तर दिवसभरात त्यांनी काय केले याबाबत सुसंवाद झाला पाहिजे. आई वडील आणि पाल्य यात विश्वासाचे नाते वृद्धिंगत झाले पाहिजे. त्यासाठी पालकांनी आपल्या मुलाना क्वालीटी टाईम देणे गरजेचे आहे.
ज्योत्स्ना डगळे
समुपदेशक

 

 

 

 

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

बापमाणूस

- ज्योती काळे-जाधव जगाने आईच्या मातृत्वाइतकाच पित्याच्या बिनशर्त त्यागाला महत्त्व दिले आहे का? बाप म्हणजे…

20 hours ago

का आकर्षिते ही जिंदगी?

- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…

20 hours ago

श्रावणी शुक्रवार

- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…

20 hours ago

अभ्यासाची आवड आणि करिअरची दिशा

महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…

20 hours ago

जेन-झी मानसिकता

बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…

20 hours ago

मान्यता नाही, तरीही वर्ग सुरूच!

वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…

20 hours ago