दिंडोरी : प्रतिनिधी
करंजवण धरणात पोहण्यासाठी गेलेल्या करंजवण येथील साई संदिप मोरे (16) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. करंजवण येथील नुकतेच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेला शालेय विद्यार्थी साई संदिप मोरे हा करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. स्थनिक नागरिकाच्या मदतीने सुमारे अडीच तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे. उन्हाळा असल्याने दुपारच्या सुमारास परिसरातील अनेक युवक आंघोळीसाठी धरणावर आले होते.जास्त गर्दी असल्याने साई पाण्यात बुडाला ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. उशिराने लक्षात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…