नाशिक

दिव्यांगांना पालिकेकडून वर्षभरात १ कोटीचे अर्थसहाय्य

विविध योजनांतून मिळते मदत
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील दिव्यांग शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच बेरोजगार दिव्यांगांना , विकलांग असलेल्यांना लाभ मिळावा , यासाठी शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे . यामध्ये पहिली ते बारावी तसेच बेरोजगार दिव्यांग , पूर्ण विकलांग अशा विविध टप्प्यात त्यांना अर्थसहाय्य देण्यात येते . तसेच विविध योजनांतून मदत केली जाते . दरम्यान २०२१ २२ या वर्षात या दिव्यांग लाभार्थ्यांना मनपाने १ कोटी १२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे . प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना प्रतिमहिना दोन हजार रुपये तर पूर्ण विकलांग दिव्यांगांना प्रतिमहिना दोन हजार रुपये अनुदान देण्यात येते . त्याचप्रमाणे पहिली ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्याथ्र्यांना दरमहा लाभ देण्यात येतो . यामध्ये एकूण २६१३ दिव्यांग असून , त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे . या शिष्यवृत्तीमध्ये आता वाढ करण्यात आली आहे . शहरात २६१३ दिव्यांग असून , त्यांना विविध योजनेतून महापालिकेच्या वतीने अर्थसहाय्याचा देण्यात येतो . पहिली ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते . बारावीनंतर पदवीपर्यंत प्रति वर्ष २५ हजार रुपये तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याला तीस हजार रुपये प्रती महिना लाभ देण्यात येतो . या योजनेत आता वाढ करण्यात येणार आहे . तसेच शहरातील जे दिव्यांग विद्यार्थी महापालिका शाळेत शिक्षण घेत असून , यापूर्वी या योजनेमधून ते वंचित आहे . त्यांनाही या वर्षात लाभ मिळवून देण्यात येणार आहे . कुणालाही वंचित ठेवण्यात येणार नाही .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

6 minutes ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

19 minutes ago

नॉन क्रिमीलेअर मर्यादा पंधरा लाख

ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…

56 minutes ago

मोटेगावकरच्या मुलासह विद्यार्थी, पालक रडारवर

नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…

1 hour ago

काटकसर-पर्व

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…

23 hours ago

माय मराठीसह बोलीभाषांचा जागर; आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा

माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…

23 hours ago