शिवीगाळ प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्यावर गुन्हा दाखल

शिवीगाळ प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्यावर  गुन्हा दाखल

मनमाड : अमिन शेख

-दोन दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांना भर सभेत फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात आलेल्या समीर भुजबळ यांचे समर्थक विनोद शेलार यांना तेथे मीडियासमोर शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी आमदार सुहास कांदे यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा विनश शेलार व शेखर पगार यांच्या तक्रारीवरून दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे गुन्हे दाखल झाल्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे
विधानसभा निवडणूक लागण्याच्या आधीपासूनच आमदार सुहास कांदे व माजी खासदार समीर भुजबळ तसेच छगन भुजबळ यांच्यात मोठ्या प्रमाणावर शीत युद्ध सुरू झाले आहे.  जसजशी निवडणूक जवळ आली तसतसे आरोप प्रत्यारोप सुरू  झाले आहेत.  आमदार कांदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 28 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या सभेत लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार हे समीर भुजबळ यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी आमदार कांदेविरोधात जोरदार भाषणही केले भाषण संपताच लागलीच सुहास कांदे यांनी शेखर पगार यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धमकीही दिली यावेळी शेखर पगार यांनी त्यांना आलेला फोन समोर बसलेल्या जनसमुदायाला माइक द्वारे ऐकवला. हे झाल्यानंतर समीर भुजबळ कार्यकर्त्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले होते यावेळी त्यांचे असलेले समर्थक विनोद शेलार व त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील आमदार सुहास कांदे यांनी  शिवीगाळ करत समीर भुजबळ यांना देखील शिवी दिली तसेच विनोद शेलार यांना देखील यावेळी धमकी दिली या नांदगाव तालुक्यात माझी दहशत आहे आणि ती कायम राहील हे जाऊन सांग असेही आवर्जून सांगितले. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस समाप्त झाल्यानंतर रात्री उशिरा विनोद शेलार व शेखर पगार यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी जीवे ठार मारण्याची धमकी देण्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे आमदार कांदेंवर गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून याबाबत नांदगाव तालुक्यात तसेच  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

2 hours ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

2 hours ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

3 hours ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

3 hours ago

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…

3 hours ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

3 hours ago