भरधाव बसेसमुळे नागरिकांचा जीव धोक्यात !

नाशिक : प्रतिनिधी शहर वाहतुकीच्या सिटीलिंकने उडविल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली . यापूर्वीही सिटीलिंकच्या धडकेत अथवा बसखाली येऊन नागरिक मृत्युमुखी पडल्याचे प्रकार घडले आहेत . सुसाट वेगाने धावणाऱ्या या बसेसमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागत असल्याचे चित्र आहे . महापालिकेने सिटीलिंक कंपनीला शहर वाहतूक बस चालविण्याचा ठेका दिलेला आहे . कंपनीने चालकांची भरती केली असली तरी सर्व चालक बस सुसाट वेगाने चालवितात . शिवाय बसला थांबण्यासाठी शहरातील जुन्या व काही नवीन थांबे निश्चित केलेले आहेत . मात्र , सिटीलिंकची बस बऱ्याचदा थांब्यापेक्षा भररस्त्यात उभी केली जाते . त्यामुळे प्रवासी उतार चढ मांना होईपर्यंत वाहतुकीचीही कोंडी होते . सीबीएस ते अशोक स्तंभ आणि रविवार कारंजा , या परिसरात रस्त्याच्या कडेलाच अनेक वाहने पार्क केलेली असतात . त्यात सिटीलिंकच्या बस संपूर्ण रस्त्यातच गुंतवून टाकते . त्यामुळे इतर वाहनांना लवकर ओव्हरटेकही करता येत नाही . सीबीएसजवळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबा दिलेला आहे . मात्र , बस भररस्त्यातच उभ्या केल्या जातात . त्यामुळे वाहतुकीची तर कोंडी होतेच ; शिवाय नागरिकांनाही उतार चढ करताना अडथळे येतात .

वेगावर नियंत्रण हवे

सिटीलिंकच्या बसेस शहराच्या मध्यवस्तीतून धावत असताना वेगाची मर्यादा ठरवून दिलेली असली तरी त्याचे पालन चालकांकडून होत नाही . मध्यंतरी मद्यधुंद अवस्थेतील एका चालकाला नागरिकांनीच बदडले होते . गर्दीतूनही बसेस सुसाट धावतात . त्यातून अपघातांचे प्रकार घडतात . बसेसचा वेग कमी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे .

सिव्हिलजवळ बसेसची रांग

जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ तर सिटीलिंकच्या बसेस भररस्त्यातच उभ्या केलेल्या असतात . जवळच सिटीलिंकचे कार्यालय आहे . या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या करून चालक – वाहक या ठिकाणी उभे असतात . त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही मोठा अडथळा निर्माण होतो . आधीच स्मार्टसिटीच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत . त्यामुळे नागरिकांना वाहने चालविताना एकीकडे तारेवरील कसरत करावी लागत असताना , दुसरीकडे भररस्त्यात उभ्या राहणाऱ्या या बसेसमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

19 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

19 hours ago