लासलगाव

लासलगाव येथे जोरदार वादळी पावसामुळे कांदा शेड भुईसपाट

 

लासलगाव:समीर पठाण

लासलगाव सह परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील दोन कांदा व्यापाऱ्यांचे कांदा शेड भुईसपाट झाले असून या शेड मध्ये असलेले अंदाजे वीस ते बावीस लाख रुपयांचे कांदे पाण्यात भिजल्याने कांद्याचेही नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला

शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह व जोरदार वाऱ्याच्या वेगाने पाऊस सुरू झाला.या पावसामुळे येथील कांदा व्यापारी अनिल अब्बड यांच्या वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे दोन कांदा शेड वाऱ्याचा वेगा मुळे जमीनदोस्त झाले त्यात बारा लाख रुपये किमतीचे दोन शेड व अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान झाले तसेच दुसरे कांदा व्यापारी भाऊसाहेब लक्ष्मणराव जगताप यांचे जगताप अँड कंपनी यांचे ६ लाख रुपये किमतीचे शेड व अंदाजे ७ लाख रुपयांचा कांदा असे मिळून अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित हानी नसल्याने मोठा अनर्थ टळला

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे या पावसामुळे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

24 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

43 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

50 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

59 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago