नाशिक

सिटीलिंक बसला तोट्यात नेणारे ‘ ते ‘ मार्ग होणार बंद

 

नाशिक : प्रतिनिधी

कोरोना काळात सुरू केलेली सिटीलिक (citylink) बस सध्या तोट्यात सुरू आहे. काही मार्गांवर या बसला तुफान प्रतिसाद मिळतोय . तर काही मार्गावर प्रवासीच नसल्याने त्या ठिकाणी मोठा तोटा सहन करावा लागतोय . दरम्यान , शहरातील किती मागांवर सिटीलिंक शहर बसला तोटा होतो आहे हे शोधण्याचे काम सुरू असून , अशा मार्गावरील शहर बस लवकरच कायमची बंद करण्यात येणार असल्याची शक्यता आहे . नाशिक शहरात २०० च्या जवळपास महापालिकेच्या बसेस रस्त्यांवर धावत आहेत. मात्र , ज्या प्रमाणात नफा होणे अपेक्षित आहे , तो होत नसल्याने सध्या बससेवा तोट्यात सापडली आहे . नाशिक महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असताना बससेवा देखील तोट्यात सापडत आहे .  ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी याबाबत आढावा बैठक घेऊन चर्चा केली. ज्या मार्गावर अत्यंत कमी उत्पन्न मिळत आहे, अशा मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करण्यात आली . ८ जुलै २०२१ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात ५० बसेस शहरातील रस्त्यावर धावत होत्या. दरम्यान, हळूहळू लॉकडाऊनची परिस्थिती दूर झाल्याने बसच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्यात आली . उत्पन्नवाढीसाठी शासनाने दिलेल्या जाहिरात धोरणाचा देखील वापर करण्यात येणार असून, महापालिकेच्या बसेसवर येत्या काळामध्ये जाहिरात दिसून येणार आहे . पहिल्या सात महिन्यांत सुमारे पाच कोटी रुपयांच्या तोट्यात महापालिकेची बससेवा सुरू होती. मात्र, महापालिका ज्याप्रमाणे इतर सुविधा नाशिककरांना देते त्याच पद्धतीने बससेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ती तोट्यात गेली तरी सेवा सुरूच राहील . केवळ तोटा कमी कसा राहील , यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे . नाशिक शहरात महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाने शहर बस चालवण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर पालिकेने धुमधडाक्यात बससेवा सुरू केली होती . मात्र , आता सिटीलिक बसला देखील तोट्याचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे . यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासन आता कमी उत्पन्नाच्या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद करण्याची शक्यता आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago