महाराष्ट्र

सिटीलिंक सुरू करत आहे तीन नविन मार्गांवर बससेवा

 

 

नाशिक: प्रतिनिधी  नाशिक  महानगर परिवहन महामंडळ लि . अर्थातच सिटीलिंकच्या वतीने १ ) मार्ग क्रमांक २२८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते चुंचाळे गाव , २ ) मार्ग क्रमांक २३८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ •तसेच ३ ) मार्ग क्रमांक २३ ९ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते गंगावऱ्हे असे तीन नवीन मार्ग सोमवार दिनांक २५ एप्रिल २०२२ पासून सुरू करणार आहे . सदयस्थितीत सिटीलिंकच्या ४७ मार्गांवर एकूण २०२ बसेस धावत आहे . मात्र प्रवाशांची होणारी मागणी लक्षात घेता सिटीलिंक टप्प्याटप्प्याने अजूनही नवीन बसमार्ग सुरू करीत आहे . याच पार्श्वभुमीवर सोमवार दि . २५ एप्रिल २०२२ पासून तीन नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहे . १ ) मार्ग क्रमांक २२८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते चुंचाळे गाव • मार्गे व्दारका , शालिमार , नवीन सि बी एस , कामटवाडा असणार आहे . या मार्गावरील पहिली बस सकाळी ६.१० वाजता तर शेवटची बस १८.३५ वाजता सुटणार आहे .२ ) मार्ग क्रमांक २३८ नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ मार्गे व्दारका , सि बी एस , आनंदवली , गंगापूर रोड असेल . नाशिकरोड ते मुक्त विदयापीठ पहिली बस सकाळी ८.४० वाजता सुटेल तर शेवटची बस १६.३० वाजता सुटेल . मुक्त विदयापीठ येथुन १८.०० वाजता नाशिकरोड करिता फेरी उपलब्ध आहे . ३ ) मार्ग क्रमांक २३ ९ नाशिकरोड ते गंगावऱ्हे मार्गे व्दारका , सी बी एस , आनंदवली , गंगापूररोड असेल . नाशिकरोड ते गंगावऱ्हे पहिली बस सकाळी ७.१० वाजता तर शेवटची बस २२.०० वाजता निघेल . व पंचवटी कनेक्शन करिता गंगाव हे ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन ५.४५ वाजता व नाशिकरोड ते गंगावऱ्हे २२.०० वाजता फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . अशाप्रकारे मार्ग क्र . २२८ , २३८,२३ ९ असे तीन नवीन मार्ग सोमवार पासून सुरू होत असून या बससेवेमुळे विदयार्थी , नोकरदार , कामगार यांची चांगली सोय होणार आहे . जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago