महाराष्ट्र

सिटीलिंक सुरू करत आहे तीन नविन मार्गांवर बससेवा

 

 

नाशिक: प्रतिनिधी  नाशिक  महानगर परिवहन महामंडळ लि . अर्थातच सिटीलिंकच्या वतीने १ ) मार्ग क्रमांक २२८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते चुंचाळे गाव , २ ) मार्ग क्रमांक २३८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ •तसेच ३ ) मार्ग क्रमांक २३ ९ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते गंगावऱ्हे असे तीन नवीन मार्ग सोमवार दिनांक २५ एप्रिल २०२२ पासून सुरू करणार आहे . सदयस्थितीत सिटीलिंकच्या ४७ मार्गांवर एकूण २०२ बसेस धावत आहे . मात्र प्रवाशांची होणारी मागणी लक्षात घेता सिटीलिंक टप्प्याटप्प्याने अजूनही नवीन बसमार्ग सुरू करीत आहे . याच पार्श्वभुमीवर सोमवार दि . २५ एप्रिल २०२२ पासून तीन नवीन बसमार्ग सुरू करण्यात येत आहे . १ ) मार्ग क्रमांक २२८ नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते चुंचाळे गाव • मार्गे व्दारका , शालिमार , नवीन सि बी एस , कामटवाडा असणार आहे . या मार्गावरील पहिली बस सकाळी ६.१० वाजता तर शेवटची बस १८.३५ वाजता सुटणार आहे .२ ) मार्ग क्रमांक २३८ नाशिकरोड ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ मार्गे व्दारका , सि बी एस , आनंदवली , गंगापूर रोड असेल . नाशिकरोड ते मुक्त विदयापीठ पहिली बस सकाळी ८.४० वाजता सुटेल तर शेवटची बस १६.३० वाजता सुटेल . मुक्त विदयापीठ येथुन १८.०० वाजता नाशिकरोड करिता फेरी उपलब्ध आहे . ३ ) मार्ग क्रमांक २३ ९ नाशिकरोड ते गंगावऱ्हे मार्गे व्दारका , सी बी एस , आनंदवली , गंगापूररोड असेल . नाशिकरोड ते गंगावऱ्हे पहिली बस सकाळी ७.१० वाजता तर शेवटची बस २२.०० वाजता निघेल . व पंचवटी कनेक्शन करिता गंगाव हे ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन ५.४५ वाजता व नाशिकरोड ते गंगावऱ्हे २२.०० वाजता फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . अशाप्रकारे मार्ग क्र . २२८ , २३८,२३ ९ असे तीन नवीन मार्ग सोमवार पासून सुरू होत असून या बससेवेमुळे विदयार्थी , नोकरदार , कामगार यांची चांगली सोय होणार आहे . जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिटीलिंकच्या वतीने करण्यात आले आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago