पावसाळ्यात कपड्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण दमट हवामानामुळे कपड्यांना वास येणे, बुरशी येणे किंवा रंग फिका होणे, अशा समस्या उद्भवतात. खाली दिलेल्या पाच उपयुक्त टिप्समुळे कपड्यांची योग्य देखभाल करता येईल…
ओलसर कपडे लगेच वाळत घाला ः
पावसात भिजलेले कपडे तसेच ठेवू नका. शक्य तितक्या लवकर त्यांना वाळवणे आवश्यक आहे. यामुळे बुरशी आणि वाईट वास टाळता येतो.
साबणाने नीट धुवा आणि अँटिसेप्टिक वापरा :
कपडे धुताना डेटॉलसारखे अँटिसेप्टिक द्रावण वापरा. यामुळे बॅक्टेरिया आणि दुर्गंधीपासून संरक्षण मिळते.
सूर्यप्रकाश नसल्यास घरात वाळवण्यासाठी हवेचा प्रवाह असलेली जागा निवडा.
बाहेर वार्याने किंवा सुसज्ज व्हेंटिलेशन असलेल्या घराच्या कोपर्यात कपडे वाळवा. गरज असल्यास फॅन लावा.
कपड्यांच्या नीट घड्या घाला आणि सुगंधी
नाफथलीन बॉल्स ठेवा.
कोरडे कपडे कपाटात ठेवताना कपड्यांमध्ये सुगंधी नाफथलीन बॉल्स किंवा कापर (कॅम्पर) ठेवा. हे बुरशी आणि कीटकांपासून संरक्षण करतात.
पॉलिथिनमध्ये कपडे साठवू नका :
पावसाळ्यात हवा खेळती राहणं गरजेचं असतं. त्यामुळे पॉलिथिनमध्ये कपडे
साठवल्यास बुरशी येण्याची शक्यता वाढते.
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…