नाशिक

सरदवाडी धरणात दूषित पाण्याचा शिरकाव; पाच गावांच्या पिण्याच्या पाण्यावर संकट

औद्योगिक सांडपाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीतून नाल्यांद्वारे येणारे दूषित पाणी सरदवाडी धरणात मिसळत असून, त्यामुळे 5 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतावरच संकट ओढावले आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लोणारवाडी, जामगाव, पास्ते, सरदवाडी आणि भाटवाडी या गावांच्या पाणीपुरवठा योजना सरदवाडी धरणावर अवलंबून आहेत. सध्या धरणात मृत साठा शिल्लक असतानाच माळेगाव बंधार्‍यात जमा होणारे सांडपाणी व औद्योगिक दूषित पाणी नाल्यांमार्फत धरणात पोहोचत आहे. बहुतेक कंपन्यांनी अंडरग्राउंड पाइप टाकून त्यातून हे पाणी माळेगाव परिसरातील नाल्यात सोडले आहे. तेच पाणी थेट सरदवाडी धरणात पोहोचत असल्याने धरणातील शिल्लक पाणीसाठा प्रदूषित होत असून, परिसरातील विहिरींनाही केमिकलयुक्त पाणी उतरले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळे पाच गावांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि माळेगाव ग्रामपंचायत यांना तातडीने पत्र पाठवून दूषित पाण्याला अटकाव घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

आंदोलनाचा इशारा

सरदवाडी धरणावर अवलंबून असलेल्या पाच गावांतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. दूषित पाण्याचा प्रवाह तातडीने बंद करून जबाबदारांवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाटवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज महात्मे, लोणारवाडीचे सरपंच डॉ. सदाशिव लोणारे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

अनेक वर्षांपासूनचा प्रश्न

ग्रामस्थांच्या मते, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) प्रभावीपणे न वापरता दूषित पाणी थेट नाल्यांमध्ये सोडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रदूषित पाणी सरदवाडी धरणात पोहोचत असून, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत आहे. यापूर्वीही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Contaminated water enters Sardwadi dam; Drinking water crisis for five villages

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

6 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago