पुणे : प्रतिनिधी
पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खतांच्या पुरवठा साखळीवर मोठी टांगती तलवार आहे. याचा परिणाम आगामी काळात खतांच्या उपलब्धतेवर आणि किमतींवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांनी राज्यातील शेतकर्यांना ‘युरिया’ला सक्षम पर्याय शोधण्याचे आणि खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकर्यांनी खतांच्या उपलब्धतेबाबत धास्ती न घेता, आधुनिक आणि नैसर्गिक पर्यायांकडे वळणे काळाची गरज बनले आहे. युद्धामुळे पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झालेला आहे. भारताला लागणार्या खतांपैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातील देशांमधून आयात केला जातो. युद्धामुळे वाहतूक आणि उत्पादनावर परिणाम होत आहे. हे युरियावरील अवलंबित्व जागतिक अशांततेच्या काळात अडचण निर्माण करते. भारतीय शेतीमध्ये नत्राचा (नायट्रोजन) पुरवठा करण्यासाठी युरियाचा वापर सर्वाधिक होतो. मात्र, आयातीत घट झाल्यास त्याचा तुटवडा भासू शकतो. पारंपरिक दाणेदार युरियाच्या गोणीऐवजी ‘नॅनो युरिया’च्या बाटलीचा वापर करा. ही खते पिकांच्या पानांवर फवारली जात असल्याने ती अधिक प्रभावी ठरतात आणि वाया जात नाहीत. जमिनीत नत्राचे प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढवण्यासाठी धेंचा किंवा ताग यांसारखी हिरवळीची पिके घेऊन ती जमिनीत गाडावीत. यामुळे जमिनीचा पोतही सुधारतो. शेणखत, कंपोस्ट खत आणि गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करा. झोटोबॅक्टरसारख्या जिवाणू खतांचा वापर केल्यास हवेतील नत्र शोषून घेण्यास मदत होते, ज्यामुळे रासायनिक युरियाची गरज कमी होते. आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घ्या. जमिनीला जितकी गरज आहे, तितकीच आणि तीच खते द्या. यामुळे अनावश्यक खर्च वाचेल आणि जमिनीचे आरोग्यही टिकेल. शक्य असल्यास विद्राव्य खतांचा वापर ठिबकद्वारे करा. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि कमी मात्रेत जास्त परिणाम मिळतो.
कृषी विभागाचा सल्ला
शेतकर्यांनी खतांची साठेबाजी करू नये. बाजारात उपलब्ध असलेल्या नॅनो युरिया आणि इतर पर्यायी खतांची माहिती घेण्यासाठी आपल्या भागातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण होणार्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ’स्मार्ट’ शेतीचा अवलंब करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
Farmers, find alternatives to urea fertilizer: Agriculture Minister’s appeal
सिन्नर : प्रतिनिधी एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले…
निफाड उपविभागीय अधिकार्यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…
इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…
ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ दिंडोरी : अशोक केंग तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली…
भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…
भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…