नाशिक

डाळिंबबागेने नेसला ‘पांढरा शालू’

सिन्नर : प्रतिनिधी
एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नव्हे, तर पशुपक्षी आणि शेती पिकांनाही बसत आहे. विशेषतः फळबागांवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येत असून,
फुलगळ, फळगळ आणि उत्पादन घटण्याची भीती शेतकर्‍यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत घोटेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी सुनील साईनाथ घोटेकर (40) यांनी आपल्या डाळिंबबागेसाठी केलेला अभिनव प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
घोटेकर यांनी आपल्या सुमारे सहा एकर क्षेत्रातील डाळिंबबागेवर पांढर्‍या कापडी आच्छादनाचा वापर केला आहे. या आच्छादनामुळे संपूर्ण बाग जणू पांढर्‍या शालूने नटल्याचे आकर्षक दृश्य निर्माण झाले आहे. मात्र, या प्रयोगामागे केवळ सौंदर्य नसून, शास्त्रीय दृष्टिकोनातून उष्णतेचा परिणाम कमी करण्याचा हेतू आहे.
पांढर्‍या कापडामुळे सूर्यप्रकाशाची थेट तीव्रता कमी होते आणि बागेतील तापमान काही अंशी नियंत्रित राहते. परिणामी, झाडांवरील उष्णतेचा ताण कमी होतो. यामुळे फुलांची गळती कमी होऊन फळधारणा टिकून राहण्यास मदत होते. विशेषतः डाळिंबासारख्या नाजूक पिकांसाठी हा उपाय उपयुक्त ठरत असल्याचे घोटेकर यांनी सांगितले.

The pomegranate orchard has woven a ‘white shawl’

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शासकीय जमिनीवरील घरे होणार अधिकृत

निफाड उपविभागीय अधिकार्‍यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…

21 minutes ago

आदिवासी भागातील डोंगरदर्‍यांत बहरताहेत करवंदे

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्‍या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…

29 minutes ago

बिबट्याने वर्षभरात 6 बळी घेऊनही वन विभाग सुस्त

ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ दिंडोरी : अशोक केंग तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली…

42 minutes ago

दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण

भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…

1 hour ago

पंचायत राज : तळागाळातील लोकशाहीचा पाया

भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…

1 hour ago

जबाबदारीने बोला!

राजकीय नेत्यांनी जबाबदारीने आणि सभ्यतेने बोलावे, त्यांनी सभ्य भाषा वापरावी, घटनात्मक पदांची मानमर्यादा राखावी, अशा…

2 hours ago