काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू
नाशिक: प्रतिनिधी
काश्यपी धरणात बुडून पती-पत्नी सह दोघा भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यात पत्नी ही सहा ते सात महिन्याची गर्भवती होती.
हरसूल हद्दीत असलेल्या काश्यपी धरण परिसरात पर्यटनासाठी सचिन कैलास ठोंबरे, वय अंदाजे 30 वर्षे, सध्या राहणार मखमलाबाद, मूळ राहणार, पिंपरणे, ता. संगमनेर, रोहिणी सचिन ठोंबरे, वय 25 वर्षे आणि घरा शेजारी राहणारे केतन अनिल पवार, वय 16 वर्षे, रा. मखमलाबाद, कौशल अनिल पवार, वय 14 वर्षे, हे गेले होते. अंघोळीसाठी सर्व जण पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण बुडाले. पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. मृत रोहिणी ही सहा ते सात महिन्याची गर्भवती होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…