नाशिक : प्रतिनिधी
सावरगाव येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या चार जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी घडली. या घटनेमुळे सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील धरणाच्या बॅकवॉटर परिसरात दुपारी सुमारे 4.10 वाजेच्या सुमारास काही युवक-युवती फिरण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र चौघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृतांमध्ये गणेश सुरेश गोतरणे (वय 16), साहिल मनोहर गोतरणे (वय 16), निखिल मच्छिंद्र गोतरणे (वय 16, सर्व रा. सावरगाव) तसेच मयुरी पवन जाधव (वय 21, रा. तळेगाव अंजनेरी) यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सावरगाव आणि तळेगाव अंजनेरीत शोककळा पसरली असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Four people drowned in the dam’s backwaters at Savargaon.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…