फरार निदा खानला अखेर अटक; छत्रपती संभाजी नगरमधून ताब्यात

फरार निदा खानला अखेर अटक

छत्रपती संभाजी नगरमधून ताब्यात
नाशिक: प्रतिनिधी
टीसीएस धर्मांतर प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खानला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेतले आहे. आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या कंपनीत काम करणारी निदा खान चा यात सहभाग असल्याचे उघड झाले होते. मुंबई नाका पोलिसांनी कंपनीतील एच आर मॅनेजर चैनानी सह इतर सर्व सहभागी संशयित आरोपींना अटक केली होती. हे सर्व जण सध्या कोठडीत आहेत. परंतु निदा खान गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाली होती. तिने नाशिकरोड येथील न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. ती गर्भवती असल्याने तिला जामीन द्यावा, अशी याचिका निदा खान च्या वकिलांनी कोर्टात केली होती. त्यासाठी वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. मात्र नाशिकरोड न्यायालयाने तिचा जामीन फेटाळून लावला होता, त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या निदा खान च्या कुटुंबाची मध्यंतरी माजी खासदार इम्तियाज जमील यांनी भेट घेऊन तिच्या पाठीशी राहण्याचा शब्द दिला होता तर निदा खान पोलिसांना चकमा देत असल्याने तिच्या शोधासाठी तीन वेगवेगळे पथके तैनात करण्यात आले होते. मध्यंतरी मुंब्रा येथून तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली होती. मात्र तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. तथापि, ती छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांना समजताच गुन्हे शाखा आणि देवळाली कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छत्रपती संभाजी नगर येथून निदा खान ला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
–///
तपासाला गती येणार
निदा खानवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल आहे. याशिवाय टीसीएस कंपनीत झालेल्या धर्मांतर प्रकरणात देखील तिचा हात असल्याचा तपासात उघड झाले आहे. निदा खान च्या अटकेमुळे आता या तपासाला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस करणार या गोष्टीचा तपास
निदा खान चा टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणात नेमका कसा सहभाग होता, फरार झाल्यापासून ती कुठे होती, कुणाच्या संपर्कात होती, या काळात तिला कोणी मदत केली?या सर्व बाबींचा तपास पोलीस करण्याची शक्यता आहे.
भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

8 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

8 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

8 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

8 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

8 hours ago