इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बुधवारी धबधबा पॉईंटच्या पुढील वळणावर क्रूझर उलटून झालेल्या अपघातात बालिका ठार झाली. तर सात जण जखमी झाले.
कसारा घाटाच्या वळणावर क्रूझर एम.एच 22- यू 2801 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात दर्शना विजय कांबळे (11, रा.मंठा जि.जालना ) ही बालिका ठार झाली तर लिलाबाई लिंबाजी राठोड (30, वर्ष रा. मालेगाव), लिंबाजी राठोड (40, रा .मालेगाव) विठ्ठल चव्हाण (45 रा. वसई), जयश्री गजानन पवार (34 रा. वसई),अनवी गजानन पवार(1 वर्ष रा.वसई), कल्पना राजेश जाधव (30, रा. वसई) शामराव चव्हाण (60,रा. वसई) हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर मयतास व जखमीस टोलनाका ऍम्बुलन्सने कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला केले
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…