काम अंतिम टप्यात; मनपा आयुक्त खत्रींची पाहणी
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही स्थळांना जोडणारा त्र्यंबकरोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरील व्हाइट टॉपिंगद्वारे काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. खडकाळी ते आयटीआय तसेच आयटीआय ते मनपा हद्दीपर्यंत सुरू असलेल्या रस्ता प्रकल्पांतर्गत त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा मार्ग लवकरच नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी (दि.23) प्रत्यक्ष कामकाज स्थळाला भेट देऊन संबंधित कंत्राटदाराकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. रस्त्याच्या गुणवत्तेची करण्यात आलेल्या तपासणीत अपेक्षित किमान 180 मिमी काँक्रीट जाडीच्या तुलनेत प्रत्यक्षात 185 मिमी जाडी आढळली. या प्रकल्पात बॉन्डेड व्हाइट टॉपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विद्यमान डांबरी रस्त्यावरच काँक्रीटचा नवीन थर विकसित करण्यात येत आहे. आयुक्तांनी संबंधित कंत्राटदारांना तातडीने अंतिम कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आवश्यक काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या रस्त्याची स्वच्छता तसेच अंतिम तांत्रिक प्रक्रिया सुरू असून, काम पूर्ण होताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यावेळी आयुक्त खत्री म्हणाल्या, की महापालिकेकडून शहरातील सर्व रस्ते विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि टिकाऊपणाला
सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, हे आमचे प्राधान्य आहे. अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
नागरिकांना दिलासा मिळणार
शहरातील वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेता, हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. रस्ता सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिक, तसेच वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ITI Signal to Satpur road to open.
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…