मुख्यमंत्री : पन्नास लाख शेतकर्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प
मुंबई : प्रतिनिधी
पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप-2026’ या उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी शुभारंभ करण्यात आला. ही केवळ एक स्पर्धा नसून शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ असल्याचे सांगत, राज्यातील सद्यःस्थितीतील 18 हजार शेतकरी गटांच्या माध्यमातून भविष्यात तब्बल पन्नास लाख शेतकर्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ’स्मार्ट शेती अॅप’चे लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) शेतीत वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. तसेच जमिनीच्या मालकी हक्कात नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता देण्यासाठी विधानमंडळात आगामी काळात ’महिला शेतकरी विधेयक’ मंजूर करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
गटशेतीमुळे शेतकर्यांचा मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे मागील वर्षीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांच्या सोयाबीन, कापूस आणि मका उत्पादनात सरासरी 71 टक्क्यांनी वाढ झाली
आहे.सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर तब्बल 1,584 कोटी रुपयांची, तर मजुरीत एकरी सुमारे सहा हजार रुपयांची बचत झाली आहे. यावर भर देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, सामूहिक शेतीतून उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मोठी मदत मिळते. तसेच, राज्य शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून कर्जमाफी व वीज सवलतींसारख्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
यंदाच्या वर्षी ’अल निनो’मुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, पुढील 15 दिवसांत गावोगावी जलसंधारणाची, गाळ काढण्याची आणि पाणी अडवण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पाणी फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते आमिर खान यांनी केले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकर्यांचे सक्षम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला शेतकरी गट, कृषी अधिकारी आणि ’उमेद’च्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून गटशेतीतील त्यांचे प्रेरणादायी अनुभव जाणून घेतले व भविष्यात उत्कृष्ट काम करणार्या गावांना स्वतः भेट देणार असल्याचे आश्वासनही दिले.
Maharashtra is the first state in the country to use AI in agriculture.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…