50 वर्षांनंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा
नवी दिल्ली :
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने आर्टेमिस-2 मिशन केनेडी अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या लाँच केले. अमेरिकेच्या वेळेनुसार, संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार, गुरुवारी पहाटे 3.54 वाजता) हे मिशन सुरू झाले. नासाच्या अपोलो मोहिमेनंतर 50 वर्षे कोणत्याही मानवाने पृथ्वीपासून इतका मोठा प्रवास केला नव्हता. नासाच्या ‘आर्टेमिस-2’ अभियानाद्वारे चार अंतराळवीर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालतील आणि सुमारे दहा दिवसांनी पृथ्वीवर परततील.
नासाच्या या मोहिमेत चार अंतराळवीर सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे नासाने आर्टेमिस 2 मिशनसाठी आवश्यक असलेली वेट टेस्टिंग पूर्ण केली नाही. यापूर्वी फेब्रुवारीत ही टेस्ट झाली त्यावेळी गळती होत असल्याचे समोर आले होते. पण ही अडचण दूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि कोणत्याही चाचणीशिवाय आता यान हे चंद्राकडे झेपावले आहे.
मोहिमेचे खास वैशिष्ट्ये
आर्टेमिस-2 मोहिमेत अंतराळवीरांना चंद्राजवळ पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. अपोलो मोहिमेतदेखील इतकाच कालावधी चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागला होता.
आर्टेमिस-2 मोहिमेच्या माध्यमातून सिस्टिमचे निरीक्षण करण्यात येईल. यामध्ये आपत्कालीन प्रक्रिया, रेडिएशनच्या माध्यमातूनसुरक्षा आणि लेझरवर आधारीत अत्याधुनिक संवादाचे तंत्रज्ञान विकसीत होईल. ही मोहिम आगामी अंतराळ अभियानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावर पुन्हा मानवाला उतरवण्याचा आणि मंगळ ग्रहावर सुद्धा अंतराळवीराला उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे. मोहिमेचा केवळ इतकाच एक उद्देश नाही. चंद्रावर मानवी वसाहत तयार करण्यासाठी आणि मंगळ ग्रहावरही वसाहतीचा प्रयोग राबवण्यासाठी ही मोहिम आवश्यक मानली जात आहे.
या अंतराळवीरांचा मोहिमेत सहभाग
नासाच्या आर्टेमिस-2 मोहिमेसाठी चार अंतराळवीरांचा समावेश करण्यात आला आहे. यात रीड वाईजमॅन (मोहीमप्रमुख), विक्टर ग्लोवर (मोहीमचालक), क्रिस्टिना कोच (मोहीम तज्ज्ञ) आणि कॅनडा येथील अंतराळ संस्थेचे सदस्य जैरेमी हँसन (मोहीम तज्ज्ञ) आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जवळपास एक वर्ष घालवलेल्या 47 वर्षीय कोच या चंद्राच्या परिसरात पोहोचणार्या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत.
NASA’s Artemis-2 mission successfully launched
सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…
नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…
पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…
रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील.…
संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…