विद्यार्थ्यांवरील अमानुष कारवाईच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी
नवी दिल्ली : प्रतिनिधी
राज्यसभेत ’लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) संशोधन विधेयक’ अर्थात अँटी-पेपर लीक बिलावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. देशभरात वारंवार होणार्या पेपर फुटीच्या घटना आणि त्याविरोधात आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष कारवाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. पेपर फोडणारे गुन्हेगार आणि चोरटे बिनदिक्कतपणे मोकाट फिरत आहेत, तर दुसरीकडे प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर मात्र लाठ्या उगारल्या जात आहेत, हा नेमका कसला न्याय आहे, असा थेट सवाल खर्गे यांनी सरकारला विचारला.
दिल्लीमध्ये जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान त्यांच्यावर करण्यात आलेल्या बळाच्या वापरावरून खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सुरक्षा दलांकडून पॅलेट गन, शॉक देणार्या लाठ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करणार्या मुद्द्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी मौन का बाळगले आहे, त्यांच्या तोंडाला कोणी कुलूप लावले आहे का, असा बोचरा सवाल करत खर्गे यांनी या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून शाह यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी राज्यसभेत केली.
पंतप्रधानांनी खुर्ची वाचविली!
याशिवाय, या वाढत्या जनक्षोभाचा आणि विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाचा धसका घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली खुर्ची आणि सत्ता वाचवण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवल्याचा दावाही खर्गे यांनी आपल्या भाषणात केला. बंद दाराआड बसून आणि बळाचा वापर करून सरकार जनतेचा व तरुणांचा आवाज जास्त काळ दाबू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. जर सरकारने आपली दडपशाहीची नीती आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय त्वरित थांबवला नाही, तर भविष्यात हीच युवाशक्ती आणि संतप्त जनता सत्ताधार्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी रस्त्यावर उतरेल, असा थेट इशारा मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारला दिला आहे.
Opposition aggressively demanding Shah’s resignation
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…