नाशिक : प्रतिनिधी
जुन्या नाशिकमधील बुधवार पेठ येथील पाटील गल्ली परिसरात मंगळवारी (2 जून) दुपारी 2 वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला असून, 24 तासांहून अधिक कालावधी उलटूनही वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या कर्मचार्यांशी व अधिकार्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समस्येच्या निराकरणाबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दीर्घकाळ वीजपुरवठा बंद असल्याने घरगुती कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
याचदरम्यान, पाटील गल्लीतील रस्त्यावर विद्युत वाहिनी तुटून पडलेली असून, ती वाहतुकीच्या मार्गात असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनधारकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असून, संबंधित विभागाकडून तातडीने दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात सलग 24 तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिक शहरात अशी परिस्थिती निर्माण होणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत न केल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन महावितरणच्या भद्रकाली कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रमशक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी दिला आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
♦ तात्काळ वीजपुरवठा पूर्ववत करावा.
♦ रस्त्यावर पडलेली विद्युत वाहिनी त्वरित हटवावी.
♦ परिसरातील वीज यंत्रणेची तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
♦ महावितरणने नागरिकांना समस्येबाबत स्पष्ट माहिती द्यावी.
Power supply disrupted in old Nashik; Citizens’ plight
मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…
बाजारात गावरान कैर्यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…
कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…
ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…
सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…
इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…