महाराष्ट्र

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमीनींचे दर निश्चित ! नेमके किती आहेत ‘दर’ जाणून घ्या.

नाशिक : प्रतिनिधी 
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमीनींचे दर निश्चित करण्यात आले
असून वाटाघाटीसाठी भूधारकांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याची
माहिती एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली
आहे.
 पुणे-नाशिक नविन दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे
मार्गाच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी प्रस्तावित खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे
थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत जिरायत,
हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमींनीसाठी प्रति हेक्टरी प्राथमिक दर
निश्चित करण्यात आले आहेत. या निश्चित केलेल्या दरानुसार खाजगी वाटाघाटीद्वारे
थेट खरेदी करण्यासाठी महारेल व जमीन मालकांना पुढील सहा महिन्यांची मुदत
देण्यात आली असून या मुदतीचा भूधारकांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी
गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
सिन्नर तालुक्यातील मौजे बारागांवपिंप्री, पाटपिंप्री, दातली व वडझिरे तसेच मौजे
दोडी खुर्द. व देशवंडी या गावांचे जिल्हास्तरीय समितीने जिरायत जमीनीचे प्राथमिक
प्रती हेक्टरी दर निश्चित केले आहेत.

असे आहेत दर

 

 

तसेच मौजे बारागांव पिंप्री, पाटपिंप्री, वडझिरे या गावाचे थेट खरेदीने ताब्यात
घ्यावयाचे जमिनीचे हंगामी बागायत व बारमाही बागायत ही वर्गवारी निश्चित
करण्यासाठी संबधित गटाचे शिक्षण कर व रोहीयो कर पावती, गुगल अर्थ वरील
केएमझेड (KMZ) व केएमएल (KML) फाईल, सातबाऱ्यावरील मागील तीन वर्षांचे
पीकपाहणीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार हंगामी बागायतीसाठी मुळ
जिरायती जमीन दराच्या दिडपट व बारमाही बागायतीसाठी दुप्पट असे मुल्यांकन
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निश्चित करण्यात आले आहेत.

 


या निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार संबधित खातेदारांना त्यांच्या जमिनीचा व
त्यावरील इतर घटक (फळझाडे, वनझाडे, पाईपलाईन, विहीर, बांधकाम, शेड व
इतर) यांचा निश्चित करण्यात आलेला एकुण मोबदला उपजिल्हाधिकारी (भुसंपादन),
लघु पाटबंधारे, नाशिक यांच्यामार्फत कळविण्यात येणार असल्याचेही शासकीय
प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago