महाराष्ट्र

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमीनींचे दर निश्चित ! नेमके किती आहेत ‘दर’ जाणून घ्या.

नाशिक : प्रतिनिधी 
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमीनींचे दर निश्चित करण्यात आले
असून वाटाघाटीसाठी भूधारकांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याची
माहिती एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली
आहे.
 पुणे-नाशिक नविन दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे
मार्गाच्या विद्युतीकरणासह बांधकामासाठी प्रस्तावित खाजगी जमीन वाटाघाटीद्वारे
थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गत जिरायत,
हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमींनीसाठी प्रति हेक्टरी प्राथमिक दर
निश्चित करण्यात आले आहेत. या निश्चित केलेल्या दरानुसार खाजगी वाटाघाटीद्वारे
थेट खरेदी करण्यासाठी महारेल व जमीन मालकांना पुढील सहा महिन्यांची मुदत
देण्यात आली असून या मुदतीचा भूधारकांनी लाभ घ्यावा, असेही जिल्हाधिकारी
गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
सिन्नर तालुक्यातील मौजे बारागांवपिंप्री, पाटपिंप्री, दातली व वडझिरे तसेच मौजे
दोडी खुर्द. व देशवंडी या गावांचे जिल्हास्तरीय समितीने जिरायत जमीनीचे प्राथमिक
प्रती हेक्टरी दर निश्चित केले आहेत.

असे आहेत दर

 

 

तसेच मौजे बारागांव पिंप्री, पाटपिंप्री, वडझिरे या गावाचे थेट खरेदीने ताब्यात
घ्यावयाचे जमिनीचे हंगामी बागायत व बारमाही बागायत ही वर्गवारी निश्चित
करण्यासाठी संबधित गटाचे शिक्षण कर व रोहीयो कर पावती, गुगल अर्थ वरील
केएमझेड (KMZ) व केएमएल (KML) फाईल, सातबाऱ्यावरील मागील तीन वर्षांचे
पीकपाहणीचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार हंगामी बागायतीसाठी मुळ
जिरायती जमीन दराच्या दिडपट व बारमाही बागायतीसाठी दुप्पट असे मुल्यांकन
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निश्चित करण्यात आले आहेत.

 


या निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार संबधित खातेदारांना त्यांच्या जमिनीचा व
त्यावरील इतर घटक (फळझाडे, वनझाडे, पाईपलाईन, विहीर, बांधकाम, शेड व
इतर) यांचा निश्चित करण्यात आलेला एकुण मोबदला उपजिल्हाधिकारी (भुसंपादन),
लघु पाटबंधारे, नाशिक यांच्यामार्फत कळविण्यात येणार असल्याचेही शासकीय
प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

16 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

24 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

30 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

35 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

41 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

56 minutes ago