नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात गेल्या चार दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे ’तसेच धरण क्षेत्रात वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नदी किनारी लोकाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेची शाळा क्रमांक सोळा आणि गाडगे महाराज धर्मशाळा येथील 65 वृद्धांना तपोवन मध्ये हलविण्यात आले. पालिकेच्या अग्नीशमन विभागाने हे मदत कार्य केले.
याशिवाय पुढील तीन दिवस म्हणजे (दि. 14) नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिला. पालिकेने यापुर्वी धोकादायक घरांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच काही नागरिकांना हलविण्यात देखील आले. पुढच्या काही दिवसात पुराचा धोका असल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार येत्या तीन दिवसात महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…