नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात गेल्या चार दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे ’तसेच धरण क्षेत्रात वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे नदी किनारी लोकाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पालिकेची शाळा क्रमांक सोळा आणि गाडगे महाराज धर्मशाळा येथील 65 वृद्धांना तपोवन मध्ये हलविण्यात आले. पालिकेच्या अग्नीशमन विभागाने हे मदत कार्य केले.
याशिवाय पुढील तीन दिवस म्हणजे (दि. 14) नाशिक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिला. पालिकेने यापुर्वी धोकादायक घरांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच काही नागरिकांना हलविण्यात देखील आले. पुढच्या काही दिवसात पुराचा धोका असल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार येत्या तीन दिवसात महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…