नाशिक प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. सकाळची पंचामृत महापूजा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यामुर्ती सुनिल बी. शुक्रे व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नाशिक . अभय एस. वाघवसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष तथा अति. सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, जिल्हा न्यायालय, नाशिक येथील राजशिष्टाचार अधिकारी नितिन आरोटे, विश्वस्त ललित निकम, सौ. मनज्योत पाटील, डॉ. . प्रशांत देवरे, . भूषणराज तळेकर, व्यवस्थापक . सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
चैत्रौत्सव कालावधीत आलेल्या भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचा सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या परिसरात ३ ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून एकूण २६९ सी सी टी व्ही कॅमेऱ्यांवर सुरक्षरक्षकांसह महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहेत एन वेळेस उदभवणाऱ्या आपत्तीसाठी २४ तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. विश्वस्त संस्थेच्या वतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी पाणपोया, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली असून विश्वस्त संस्थेच्या परिसरात सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व विश्वस्त संस्थेचे एकूण ३ जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार असून संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी ५० हंगामी कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आलेली आहे. दि. १०/०४/२०२२ ते दि. १६/०४/२०२२ दरम्यान पूर्णतः खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी १०० एस टी बसेस प्रवाशांना नांदुरी येथून ने – आण करणार आहे चैत्र उत्सव यशस्वीतेसाठी विश्वस्त संस्थेचे कार्यकारिणी मंडळाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक श्री. सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी श्री. भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक श्री प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारीjb श्री. भिकन वाबळे आदींसह विविध विभाग प्रमुख, सहा विभाग प्रमुख, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहेत.
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…