मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा मागे घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि नेते मंडळींचा वाढता दबाव लक्षात घेऊन शरद पवार यांनी अखेर आपला निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली, यानंतर वाय बी चव्हाण सेंटरबाहेर उपस्तिथ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, यापत्रकार परिषदेला जयंत पाटील, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, प्रतिभा ताई पवार, रोहित पवार उपस्थित होते,
दरम्यान, सकाळी झालेल्या समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला होता, त्यानंतर सर्व समिती सदस्यांनी सिल्वर ओक वर जात शरद पवार यांना समिती सदस्यांनी केलेल्या ठरावाची प्रत दिली होती,
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले,
2 मे रोजी लोक माझे सांगाती या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.. या निर्णयामुळे तीव्र भावना उमटल्या होत्या. पदाधिकारी आणि जनतेत तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या,सर्वांनी मी राजीनामा मागे घ्यावा म्हणून विििनंती केली होती, या भावनाांचा माझ्याकडून अनादर होणे शक्य नाही, त्यामुळे मी राजीनामा मागे घेत असल्याचे ते म्हणाले,
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…