नाशिक

उन्हाचा तडाखा वाढला; पारा 39.4 अंशांवर, आर्द्रतेत घट

नाशिक : प्रतिनिधी
एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात नाशिकमध्ये उष्णतेची तीव्रता वाढत असून, बुधवारी (दि. 22 एप्रिल) शहराचा कमाल तापमानाचा पारा 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. किमान तापमान 22.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, दिवस-रात्र तापमानातील फरक लक्षणीय राहिला.
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, सकाळी सापेक्ष आर्द्रता 55 टक्के होती; मात्र दुपारनंतर ती झपाट्याने घटत सायंकाळपर्यंत केवळ 27 टक्क्यांवर आली. आर्द्रतेतील या घटेमुळे वातावरण कोरडे झाले असून, दुपारच्या वेळेत उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.
दरम्यान, शहरात कोरडे आणि उष्ण वातावरण कायम राहिले. सूर्यकिरणांची तीव्रता 40.8 मिमी इतकी नोंदली गेली असून, त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक
जाणवत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता असली तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे
गरजेचे आहे.

The heat of the sun has increased; mercury at 39.4 degrees, humidity has decreased

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डाळिंबबागेने नेसला ‘पांढरा शालू’

सिन्नर : प्रतिनिधी एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले…

2 days ago

शासकीय जमिनीवरील घरे होणार अधिकृत

निफाड उपविभागीय अधिकार्‍यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…

2 days ago

आदिवासी भागातील डोंगरदर्‍यांत बहरताहेत करवंदे

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्‍या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…

2 days ago

बिबट्याने वर्षभरात 6 बळी घेऊनही वन विभाग सुस्त

ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ दिंडोरी : अशोक केंग तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली…

2 days ago

दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण

भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…

2 days ago

पंचायत राज : तळागाळातील लोकशाहीचा पाया

भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…

2 days ago