नाशिक

पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती

साकूरसह परिसरात पिके जळू लागल्याने शेतकरी हवालदिल

कवडदरा : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, भरवीर, घोटी खुर्दवाडी, रोंगटेवाडी, जाधववाडी आणि धामणगाव हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अत्यंत डोंगराळ व दुर्गम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या इगतपुरी तालुक्यातच आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, पाण्याचे सर्व साठे संपुष्टात आले आहेत.
दरवर्षी या परिसरामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र, यंदा जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. स्थानिक पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत कोरडे पडल्यामुळे नागरिकांसमोर भीषण संकट उभे ठाकले आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या साकूर फाटा परिसरात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिक व्याकूळ झाले आहेत. महिलांना पुन्हा एकदा पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे.
या भागातील शेतकरी प्रामुख्याने भात, सोयाबीन आणि कांदा या नगदी पिकांना प्राधान्य देतात. परंतु, यंदा जून अखेरपर्यंत पावसाचा एक थेंबही न पडल्याने पिके शेतकर्‍यांच्या डोळ्यांदेखत जळून खाक होत आहेत. प्रचंड उष्णतेची लाट आणि पाण्याची टंचाई यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पिकांसोबतच जनावरांचा चारा असलेले घास, मका, कडवळ आणि गिन्नी गवत यांसारखी पिकेही अंतिम श्वास घेत आहेत.
पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली असून, भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने आता धरणांमधून सोडली जाणारी आवर्तने बंद केली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भाषेत सांगायचे तर, भर पावसाळ्यात पाण्याला आग लागली आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

चार्‍यासाठी उपाययोजनांची गरज

जर येत्या 30 जूनपर्यंत पाऊस पडला नाही तर शेतकर्‍यांना शेती करणे अशक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर, आता पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चार्‍यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Women’s struggle for water during the monsoon

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

9 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago