नाशिक

घाईगडबडीत पेरणी नको!

पुरेसा पाऊस आणि जमिनीतील ओलावा पाहूनच निर्णय घेण्याचा कृषी विभागाचा सल्ला

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतजमिनीची मशागत पूर्ण करून अनेक शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीत आहेत. मात्र, केवळ वरवरची माती ओली झालेली पाहून पेरणीची घाई करणे शेतकर्‍यांच्या अंगलट येऊ शकते, असा इशारा कृषी अधिकार्‍यांनी दिला आहे. जमिनीच्या आतपर्यंत पुरेसा ओलावा असल्याशिवाय केलेली पेरणी अत्यंत महाग पडू शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनीही कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना दिलेला आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या पडत असलेल्या विखुरलेल्या पावसामुळे शेताच्या वरच्या थरावर ओलावा (नमी) दिसून येत आहे. हे पाहून अनेक शेतकरी सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि तीळ यांसारख्या खरीप पिकांची पेरणी करत आहेत. परंतु, जर पेरणीनंतर लगेचच पुढील काही दिवस चांगला पाऊस झाला नाही, तर कडक उन्हामुळे बियाणे अंकुरण्यापूर्वीच जळून खाक होऊ शकतात किंवा अंकुर आल्यानंतर कोमेजून सुकू शकतात. अशा स्थितीत शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची संकट कोसळू शकते, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढून मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी करताना सांगितले आहे की, जोपर्यंत शेतात किमान 75 मिमी (किंवा सुमारे 4 इंच) इतका दमदार पाऊस होत नाही आणि जमिनीच्या खोलीपर्यंत पुरेशी ओल तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करणे टाळावे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी जमिनीचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असणेही आवश्यक मानले जाते. साधारणपणे 15 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा काळ खरीप पेरणीसाठी अत्यंत योग्य मानला जातो, त्यामुळे शेतकर्‍यांनी हवामान अंदाज आणि पावसाची योग्य उपलब्धता पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा.

Avoid hasty sowing!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार…

- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…

16 hours ago

मोबाईलमुळे भविष्य संकटात

- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…

16 hours ago

नाठाळांच्या माथी हाणा काठी!

- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…

16 hours ago

ऐतिहासिक स्थळांवर कायमस्वरूपी पर्यटकांचा ओघ वाढावा

- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…

16 hours ago

खड्ड्यांचे पाप कोणाचे?

- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…

16 hours ago

ऊर्जेची बचत, यशाची गुरुकिल्ली!

- जगन घाणेकर  वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…

17 hours ago