शेतकर्यांना दिलासा; मात्र तालुक्यात दुबार पेरणीचे संकट कायम
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे 3 ते 3.30 वाजेच्या दरम्यान ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल एक ते दीड तास सुरू असलेल्या या पावसामुळे परिसरातील शेतकर्यांची एकच धावपळ उडाली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या जळकू परिसरातील शेतकर्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर तालुक्यात खरीप हंगामातील प्रलंबित पेरण्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आल्या. सध्या तालुक्यात सुमारे 50 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने शेतातील नव्याने उगवलेल्या पिकांवर संकट ओढवले आहे. मालेगाव तालुक्यात प्रामुख्याने मका व कापूस या पिकांची लागवड केली जाते. या पिकांच्या प्रारंभीच्या वाढीसाठी नियमित पावसाची नितांत आवश्यकता असते. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली असून, लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, जळकू परिसरात झालेल्या मुसळधारेमुळे तेथील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश गावांत अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकर्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.
Cloudburst-like rainfall in the Jalku area.
- अॅड. प्रतीक्षा चौधरी पावसाळ्याची सकाळ होती. सगळीकडे चिंब असं वातावरण झालेलं होतं. आज आमच्या…
- अमोल जगताप नाशिकमध्ये नुकतीच घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करून गेली. प्रेमसंबंधातून…
- प्रा. योगेश हांडगे आजच्या घरात, महाविद्यालयात, कार्यालयात किंवा समाजात एक पिढी सतत चर्चेत आहे-जेन…
आमदार डॉ. राहुल आहेरांंच्या पाठपुराव्याला यश; लोकार्पण, जलपूजन चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडबारे येथील तांबटी…
परीक्षा म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसते; ती विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची आणि भविष्यातील संधींची खरी कसोटी…
फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची कंपनी असलेल्या मेटा कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…