महाराष्ट्रातील जनतेवर
भारनियमनाचे संकट
मुंबई : सुमारे दहा वर्षांनंतर महाराष्ट्रातील जनतेवर भारनियमनाचे संकट आले आहे.
महावितरणने भारनियमन लागू होत असल्याची घोषणा केली आहे. देशभरात विजेची मागणी वाढली असून, अनेक राज्यांमध्ये जनतेलाभारनियमनाला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्रात भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र विजेची वाढती मागणी व कोळशाअभावी अपुर्या वीज निर्मितीमुळे सुमारे 2500 ते 3000 मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी गरजेनुसार शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विजेचे तात्पुरते भारनियमन करावे लागणार आहे.
फेब्रुवारीपासून उष्णतेच्या लाटा येत असून, औद्योगिक उत्पादनासोबतच कृषिपंपाचा वीजवापर वाढला आहे. त्यामुळे राज्यात 28000 मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी आहे. मुंबई वगळता महावितरणच्या कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत तब्बल 4000 मेगावॅटने वाढ झालेली आहे. महावितरणची विजेची मागणी तब्बल 24500 ते 24800 मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख पाहता, ही मागणी 25500 मेगावॅटवर लवकरच जाण्याची शक्यता आहे. रात्री कालावधीत देखील 225000 ते 23000 मेगावॅट विजेची मागणी आहे.
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…
ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय, 43 नव्या जातींच्या समावेशाचा प्रस्ताव मुंबई : राज्यातील ओबीसी समुदायासाठी एक…
नीट पेपरफुटी प्रकरण; सीबीआयकडून झाडाझडती मुंबई : नीट पेपरफुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी…
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या काळात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीविषयी चिंता व्यक्त केली…
माय मराठीच्या अहिराणी, मावची, भिली, लेवा पाटीदार, कातोडी, सामवेदी, माडिया, गोंडी, पावरा, देहवाली, कोरकू, आंध,…